प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नगर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले.

अजूनही हिंदू एक होत नाहीत ! – शरद पोंक्षे यांची खंत

हिंदू अजून एक होत नाहीत. जागे होत नाहीत, यासारखे दुःख नाही. ऐकूया सावरकर, वाचूया सावरकर. आपण सगळ्यांनी एक होऊया. हिंदु धर्मातील सर्व जाती संपवून ‘हिंदु’ ही एकमेव जात निर्माण करूया. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करूया.

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंडळाचे मार्गदर्शक सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांचे अपघाती निधन

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत प्रमुख डॉ. सुरेशराव चिकटे यांनी सांगितले, ‘‘ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांनी कथा, प्रवचन या माध्यमांतून हिंदूसंघटनासाठी कार्य करून संपूर्ण आयुष्य हिंदु धर्मरक्षणासाठी वेचले. धर्मातील अशी विभूती जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.’’

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची हत्या करणार्‍याची माहिती देणार्‍याला ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित !

एन्.आय.ए.चे अधिकारी या प्रकरणातील प्रमुख आरोपी महंमद गौस नयाझी याचा अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत; परंतु अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.

प्रा. वेलिंगकर यांच्या मातृभाषा आंदोलनावरील ‘लोटांगण’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गोव्यातील एका ज्वलंत चळवळीवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘लोटांगण’च्या विमोचन कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाशक श्रीविद्या प्रतिष्ठान आणि लेखक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

काँग्रेसने भारताला इस्लामी देश बनवले होते ! – भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी

कुंभपर्वामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात सहस्रो परकीय पर्यटक येतात. पण कुंभपर्वात सहभागी होणार्‍या कुणाला ‘हिंदु व्हा’, असे सांगितले जाते का ? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे.

राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलावे ! – रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

राहुल गांधी यांच्या लंडन येथील विधानांविषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना इतकेच सांगीन की, राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलले पाहिजे. वास्तव काय आहे ?, हेही त्यांनी पाहिले पाहिजे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या ! – प्रवीण तोगाडिया, अध्‍यक्ष, आंतरराष्‍ट्रीय हिंदु परिषद 

ज्‍यांच्‍या प्रयत्नांमुळे श्रीराममंदिर बनत आहे, त्‍यांना ‘भारतरत्न’ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ऋणमुक्‍ती मिळवावी, असे प्रतिपादन प्रवीण तोगाडिया यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत केले.

काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती ! – भाजपचे खासदार रवि किशन

४ मुलांचा विचार केल्यावर वाईट वाटते. हा काँग्रेसचाच दोष आहे. त्यांच्याकडे सरकार होते. त्यांच्याकडे कायदा होता. आम्हाला त्या वेळी भान नव्हते, आम्ही लहान होतो.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

या दौर्‍यामध्ये त्यांनी संत, हिंदुत्वनिष्ठ आणि लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली. या दौर्‍याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.