पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांक शरणार्थींना वर्ष १९५५च्या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळणार !

सध्या हे हे नागरिक गुजरातच्या आणंद आणि मेहसाणा या २ जिल्ह्यांमध्ये रहात आहेत.

कारावासात सुरक्षेसाठी आम आदमी पक्षाच्या मंत्र्याला दिले १० कोटी रुपये ! – सुकेश चंद्रशेखर यांचा दावा

कारावासात सुरक्षेसाठी आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र यांना १० कोटी रुपये दिल्याचा दावा मंडोली कारावासात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांनी केला. सुकेश चंद्रशेखर यांच्या या दाव्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भारतीय दंड विधान आणि ‘पॉक्सो’ कायदा ‘मुस्लिम पर्सनल लॉ’च्या वर आहेत ! – कर्नाटक उच्च न्यायालय

दोन वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे सांगितले.

सिंधुदुर्ग – तोरसोळे येथील अनधिकृत खाण व्यवसाय बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

असंवेदनशील प्रशासनाला कधी तक्रारीची भाषाच समजत नाही. उपोषण, आंदोलन, रस्ता बंद यांचीच भाषा समजते किंबहुना या भाषेची सवयच झाली आहे. जाधव यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून कारवाई केली, तरच असे अवैध प्रकार थांबतील !

सिंधुदुर्ग : अल्प पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवा !

एकीकडे ‘प्रत्येक मुलाला किमान शिक्षण मिळायलाच हवे’, असे सांगितले जात असतांना पटसंख्या अल्प असल्याने दुर्गम भागातील प्राथमिक शाळा बंद करणे कितपत योग्य ? गरीब आणि आदिवासी भागांतील पालक मुलांना कधी शाळेत पाठवतील का ?

अर्भकाला बेवारस सोडण्याची ५ वर्षांत ११ प्रकरणे, तर चालू वर्षी ४ प्रकरणे नोंद ! –  बाल हक्क संरक्षण आयोग, गोवा

असले प्रकार कायद्याने नाही, तर प्रत्येकाला नीतीमत्ता शिकवूनच रोखता येतात. कर्मफलन्याय, संचित, प्रारब्ध, ईश्वराचा न्याय आदी गोष्टी ठाऊक नसल्यानेच समाज स्वैर वागत आहे. समाजातील प्रत्येकालाच साधना शिकवणे आवश्यक बनले आहे !

सरकारी कर्मचार्‍यांनी त्रास दिल्यास व्हॉट्सॲपवर तक्रार करा ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कनिष्ठ पातळीवरील कर्मचार्‍याने जर त्यांचे काम चोख बजावले, तर ९९ टक्के प्रकरणे वरिष्ठांपर्यंत पोचणारच नाही, तसेच मंत्री किंवा आमदार यांच्यापर्यंत तक्रार करण्यास वाव रहाणार नाही.

साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व लक्षात घ्या !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कार करण्याआधी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव येथील सनातनच्या आश्रमात ठेवण्यात आले होते. या वेळी त्यांचे पुत्र श्री. सुरेंद्र, श्री. राम, कन्या कु. दीपाली, तसेच अन्य नातेवाइक उपस्थित होते.

हिंदु धर्माच्या शिकवणुकीतून आपण खर्‍या धर्मनिरपेक्षतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आपल्याला अभिमन्यू बनून बलीदान द्यायचे नाही, तर अर्जुन बनायचे आहे. भक्तांचा कधी बळी जात नाही; म्हणून भक्त बनले पाहिजे. एका भक्तासाठीही देवाला प्रकट व्हावे लागते. आपल्याला लढायचे नाही, तर देवाने आपल्याला माध्यम बनवून कार्य केले पाहिजे.