हिंदु राष्ट्रात भारतीय भाषांना अग्रक्रम दिला जाईल !
‘हिंदूंनो, मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालू नका; कारण हिंदु राष्ट्रात भारतीय भाषा या शाळेतील आणि सरकारी कारभाराचे माध्यम असतील.’
‘हिंदूंनो, मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालू नका; कारण हिंदु राष्ट्रात भारतीय भाषा या शाळेतील आणि सरकारी कारभाराचे माध्यम असतील.’
‘देवाने मनुष्याला बनवले, जो त्याच्याशी परत एकरूप होऊ शकतो. मनुष्याने अनेक गोष्टी निर्माण केल्या; पण त्यातील एकही परत मनुष्याशी एकरूप होऊ शकत नाही.’
‘नामजप, सत्सेवा यांसारख्या आध्यात्मिक कृती केल्यावर त्यांचा आध्यात्मिक स्तरावर उपाय होणे, तन-मन-धन यांचा त्याग होणे यांसारखे लाभ होतात. यातून मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हे साध्य करण्यास साहाय्य होते. हल्लीच्या शिक्षणामध्ये मात्र यांसारख्या कोणत्याच कृती शिकवल्या जात नाहीत. जे काही शिक्षण दिले जाते, त्याने आध्यात्मिक उन्नती होऊच शकत नाही. थोडक्यात शालेय शिक्षणात ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अनावश्यक कृती शिकवल्या जातात.’
‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’
‘राम आणि कृष्ण यांच्या युगांत गांधीवादी असते, तर त्यांनी राम-कृष्ण यांनाही अहिंसावाद शिकवण्याचा प्रयत्न केला असता आणि रावण अन् कंस यांना जिवंत ठेवले असते. त्यामुळे हिंदू नष्टच झाले असते.’
‘पूर्वी मानसिक स्तरावरील प्रेम आधी असे आणि मग शारीरिक संबंध होत असत; परंतु आता अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये शारीरिक संबंध आधी होऊन पुढे जमले, तर दोघांमध्ये मानसिक प्रेम निर्माण होते. यामुळे आताच्या पिढ्यांना तात्कालिक सुख आणि दीर्घकाळ दुःख भोगावे लागत आहे.’
‘पूर्वीच्या पिढ्यांमध्ये वैचारिक अंतर (जनरेशन गॅप) नसायचे. प्रत्येक पिढी आधीच्या पिढीशी समरस व्हायची. आजोबा, पणजोबांपासून नातवंडे, पतवंडे एकत्र असायची. हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो !’
‘संपूर्ण जगात आज कुठेही गेलो, तर या भूतलावरील विविध विषय इंग्रजी भाषेतून शिकता येतात. त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. सर्व जण ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’
‘काही वाईट घडले की, हिंदू प्रत्येक वेळी ‘आपण कुठे न्यून पडलो ?’, याचा विचार न करता इंग्रजांची शिक्षणपद्धत इत्यादींना दोष देतात ! इंग्रज येण्यापूर्वी मुसलमानांनीही भारतावर राज्य केले. ‘यांना इंग्रज नाहीत, तर हिंदूंची चुकीची विचारसरणी कारणीभूत आहे !’, हे ते लक्षात घेत नाहीत.’
‘वेद-उपनिषदे लिहिणारे ऋषी-मुनी पूर्वीच्या सात्त्विक काळात होऊन गेले, ते बरे झाले; कारण सध्याच्या तामसिक काळात (कलियुगात) त्यांना कुणीच किंमत दिली नसती.’