केवळ हिंदु धर्मातच आहे मोक्ष देण्याचे सामर्थ्य !

‘अनेक हिंदू ‘हिंदु धर्माने आम्हाला काय दिले ? इतर धर्म आम्हाला अनेक गोष्टी देतात !’, असे म्हणून धर्मांतर करतात. ‘केवळ हिंदु धर्मच मोक्ष देतो, इतर धर्म नाही’, हे हिंदु धर्माचे महत्त्व हिंदूंवर बिंबवणे, हाच खरा धर्मांतर रोखण्यासाठीचा खरा उपाय आहे.’

पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का?

‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस, समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’

मत देतांना याचा विचार करा !

‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’

शिक्षणासोबतच वैयक्तिक गुणांनाही नोकरीत महत्त्व !

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’

केवळ शारीरिक प्रेम असणारे हल्लीचे पती-पत्नी !

‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार पालटत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’

ऋषी-मुनींचे अद्वितीय श्रेष्ठत्व !

‘ऋषी-मुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदु धर्मात १४ विद्या आणि ६४ कला या मार्गांनी साधना शिकवता येते.

अध्यात्मापुढे विज्ञानाची मर्यादा !

‘भूमीपासून थोड्याश्या अंतराळापर्यंत पोचल्याचा मोठेपणा वाटणार्‍या विज्ञानाला सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्यावर परिणाम करणार्‍या पूजा, यज्ञ यांसारख्या धार्मिक विधींच्या सूक्ष्म-शास्त्राचे १ टक्का तरी ज्ञान आहे का ?’

आत्मकेंद्रित आणि स्वार्थी भारतीय जनता !

‘भारतीय जनता स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झाल्यामुळे तिला राष्ट्र अन्‌ धर्म यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यामुळे अशा या जनतेने राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल मनात काहीच जाणीव नसणार्‍या उमेदवाराला निवडून दिले, तर यात आश्चर्य ते काय !’