ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
‘हल्ली निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांत चांगले उमेदवार अल्प प्रमाणात असल्याने मतदारांना त्यातल्यात्यात कमी वाईट उमेदवाराला मत द्यावे लागते !’
‘हल्ली निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांत चांगले उमेदवार अल्प प्रमाणात असल्याने मतदारांना त्यातल्यात्यात कमी वाईट उमेदवाराला मत द्यावे लागते !’
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे आणि अनेक राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधप्रबंध सादर केले आहेत.’
‘संत मायेतील अडचणी सोडवून साधनेची ओळख करून देतात, तर गुरु मोक्षप्राप्तीची वाट दाखवतात !’
‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’
‘काही पंथीय पैसे देऊन किंवा धमकावून इतरांना त्यांच्या पंथात खेचतात. याउलट हिंदु धर्मात येतात ते त्यातील अद्वितीय शिकवणीमुळे ! असे असले तरी बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणतात !’
‘धर्मांधांमध्ये राष्ट्रप्रेमापेक्षा धर्मप्रेम अधिक असल्यामुळे ते धर्मासाठी कधीही आणि कितीही राष्ट्रहानी करतील’, हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या अन् बहुसंख्य हिंदूंच्या लक्षात आले नाही’, हे त्यांना लज्जास्पद आहे !’
‘आजोबा, पणजोबा यांनी गुन्हा केला, तर नातवंडे, पतवंडे यांना शिक्षा करत नाहीत; मात्र काही ब्राह्मणद्वेष्टे काही पिढ्यांपूर्वी काही ब्राह्मणांनी केलेल्या कथित अपराधांची शिक्षा सर्वच ब्राह्मणांना करत आहेत. हे पाप होय !’
‘जे बुद्धीप्रामाण्यवादी ‘देव नाही’ म्हणतात, त्यांना भक्तांना येते, तशी चिरंतन आनंदाची अनुभूती कधी येईल का ?’
‘विज्ञान अनेक वर्षे एखाद्या गोष्टीचे बुद्धीने स्थुलातील कारण शोधते. याचे कारण हे की, कारण कळल्याशिवाय त्याला उपाय कळत नाही, तर अध्यात्म त्यामागील बुद्धीपलीकडील सूक्ष्मातील शास्त्र आणि उपाय तात्काळ सांगते.’
‘काही पंथांत असते त्याप्रमाणे हिंदु धर्मात धर्मप्रसार करून निव्वळ स्वतःच्या धर्मियांची वा अनुयायांची संख्या वाढवण्याला महत्त्व नाही. याउलट हिंदु धर्मात धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे. याचा अर्थ आहे, ‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’ हिंदूंचा धर्मप्रसार या तत्त्वावर आधारित असल्यामुळेच हिंदु धर्माचा गंधही नसलेले सहस्रो अन्य पंथीय विदेशी लोक आजही हिंदु धर्माकडे आकर्षित होऊन हिंदु धर्मानुसार आचरणही करत आहेत.’