जीवन-मुक्त
‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी
‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी
‘सर्वसाधारण व्यक्ती जे काही करते, त्यामागे तिचा उद्देश ‘काहीतरी हवे’, असा असतो. याउलट साधक करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा उद्देश ‘सर्वस्वाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायची’, असा असतो.’
पाश्चात्त्य विचारसरणी आणि संशोधन केवळ सुखप्राप्तीसाठी असते. माणसाची सुखाची हाव कधीच पूर्ण होत नाही; म्हणून अनेक संशोधने करूनही मानव अधिकाधिक दुःखी होत आहे.
‘पाश्चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
हिंदूंनो, या गुढीपाडव्याला भारतात विश्वकल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापित करण्यासाठी कृतीशील होण्याचा नवसंकल्प करा !’
अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म !
‘अज्ञानरूपी धुके नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्वत्र परिपूर्ण असणे, यालाही मोक्ष म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी
‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत असते, नुसती बडबड काही उपयोगाची नाही. दिलदारपणाच त्याला मोठेपणा मिळवून देतो. परहितासाठी झटणाराच खर्या अर्थाने मनुष्य होय.
‘छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांतराला नकार दिला; म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांचा अनन्वित छळ केला. त्यांच्या डोळ्यांत तिखट टाकले. एकेक अवयव तोडला. त्यात मीठ भरले, तरीही संभाजीराजांनी हिंदु धर्म सोडला नाही.