ईश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या विज्ञानाची मर्यादा !

‘आजकाल आपण ज्याला ‘विज्ञान’, म्हणजे ‘विशेष ज्ञान’ म्हणतो, ते ‘विगतं ज्ञानं यस्मात् ।’, म्हणजेच ‘ज्यातून ज्ञान निघून गेले आहे ते, झाले आहे.’ विज्ञानाला ‘ईश्‍वर आहे.  ईश्‍वर निर्गुण निराकार आहे आणि त्याची व्याप्ती अनंत कोटी ब्रह्मांडांइतकी आहेʼ, हेही ज्ञात नाही.’

विज्ञानाची बाल्यावस्था आणि अध्यात्माची परिपूर्णता !

‘अध्यात्मामध्ये अनंत-कोटी ब्रह्मांडांचे, तसेच विश्‍वाच्या उत्पत्तीपासून प्रलयापर्यंतचे ज्ञान आहे. या तुलनेत विज्ञानाला पृथ्वी काय मनुष्याच्या देहाचे कार्यही पूर्णपणे ज्ञात झालेले नाही !’

केवळ हिंदु धर्मातच आहे मोक्ष देण्याचे सामर्थ्य !

‘अनेक हिंदू ‘हिंदु धर्माने आम्हाला काय दिले ? इतर धर्म आम्हाला अनेक गोष्टी देतात !’, असे म्हणून धर्मांतर करतात. ‘केवळ हिंदु धर्मच मोक्ष देतो, इतर धर्म नाही’, हे हिंदु धर्माचे महत्त्व हिंदूंवर बिंबवणे, हाच खरा धर्मांतर रोखण्यासाठीचा खरा उपाय आहे.’

पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का?

‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस, समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’

मत देतांना याचा विचार करा !

‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’

ज्ञान कोणत्याही माध्यमातून मिळाले, तरी ते ईश्वराकडूनच मिळालेले असते, त्यामुळे त्यातून शिकण्यातला आनंद महत्त्वाचा !

ईश्वराकडून ज्ञान मिळण्याचे माध्यम पालटले असले, तरी दोन्ही माध्यमांतून ज्ञानच मिळत असल्यामुळे त्यामध्ये कोणताही कमीपणा वाटत नाही. उलट नवीन काहीतरी शिकण्याचा आनंद अधिक मिळत आहे.’

शिक्षणासोबतच वैयक्तिक गुणांनाही नोकरीत महत्त्व !

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’

केवळ शारीरिक प्रेम असणारे हल्लीचे पती-पत्नी !

‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार पालटत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’

ऋषी-मुनींचे अद्वितीय श्रेष्ठत्व !

‘ऋषी-मुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’