साधना न शिकवता शासनकर्त्यांनी सर्वधर्मसमभाव शिकवल्याचा दुष्परिणाम !

‘जनतेला साधना शिकवून तिला सात्त्विक करणे’, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य असतेे. त्याचे पालन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी जनतेला ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

देवाचे केवळ नामस्मरण करण्यापेक्षा त्याला सर्वस्व अर्पण केल्यास तो सर्व काही देईल !

‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

विविध विचारसरणींच्या दृष्टीने हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘पाश्‍चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात, तर हिंदु धर्मातील विचार पृथ्वीवरील आणि मृत्त्यूत्तर जीवन सुखी कसे करायचे आणि शेवटी ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, यांसंदर्भात असतात.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

व्यष्टी साधना करणारे फार थोडे साधक संतपदापर्यंत जातात, तर समष्टी साधना करणारे पुष्कळ साधक संतपद गाठतात. त्यामुळे सनातन संस्थेमध्ये समष्टी साधनेला महत्त्व आहे.

विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण असलेले हिंदु धर्मातील ‘कर्मकांड’ !

‘हिंदु धर्मातील ज्या कृतींना तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात, त्या कृतींचा अभ्यास केल्यास त्या विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहेत, हे लक्षात येऊन अभ्यासक नतमस्तक होईल.’

साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

१९ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज या लेखमालेतील अंतिम सूत्र दिले आहे.     

एकमेवाद्वितीय हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार !

‘मानवाचा जन्म का झाला ? जन्मापूर्वी तो कुठे होता ? मृत्यूनंतर तो कुठे जातो ? इत्यादी विषयांची थोडीफारही माहिती नसणारे पाश्‍चात्त्य आणि साम्यवादी मानवजातीचे प्रश्‍न कधी सोडवू शकतील का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरेच नव्हे, तर त्यांतील अशुभ कसे टाळायचे, हे ज्ञात असलेला एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार आहे !’

साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

१८ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे दिली आहेत.    

हिंदु राष्ट्राचा ध्वज भगवाच असेल !

‘हिंदु राष्ट्राचा झेंडा सत्त्व-रजप्रधान भगवा असेल. तो काही युगांपासून भारताचा झेंडा आहे. अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा तोच झेंडा होता.’