प्रारब्धावर ‘साधना’ हाच एकमेव उपाय !
कुणालाही साहाय्य करतांना त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कुणालाही साहाय्य करतांना त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘काही वेळा साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी उपाय म्हणून संत किंवा उत्तरदायी साधक त्यांना विशिष्ट नामजप करण्यास सांगतात, त्यावेळी ‘आमच्याकडून उपायांसाठी सांगितलेला नामजप होत नाही….
‘नोबेल पारितोषिक मिळवणार्यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकि ऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठ ऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
. . . त्यामुळे जगभर अशा रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वस्वाचा त्याग केलेल्या ऋषी-मुनी आणि संत यांना कधीच मनोविकार झाला नाही. याउलट ते नेहमी सत्-चित् आनंदात असायचे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अंधारामुळे प्रकाशाचे, दुर्गंधामुळे सुगंधाचे आणि वेड्यामुळे शहाण्याचे महत्त्व कळते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले