यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !

यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !

‘भक्तांकडेच मंदिरे हवीत, तरच देवाची सेवा भावपूर्ण होईल. सरकारीकरणामुळे मंदिरातील देवाची सेवा भावपूर्ण होत नाही, तसेच सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार देवळातही होतो. त्यामुळे देव मंदिरातून जाईल आणि भक्तांना देवळात जाण्याचा लाभ होणार नाही.’

लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !

लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !

‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’

हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !

हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !

‘सरकार रुग्णांवर उपाय करायला वैद्य (डॉक्टर) नसलेल्याला सांगत नाही. सरकारला न्यायालयात दावा लावायचा असेल, तर अधिवक्ता नसलेल्याला सांगत नाही; मात्र मंदिराचे व्यवस्थापन सांभाळायला भक्तीभाव नसलेल्यांकडे सरकार मंदिरांचे उत्तरदायीत्व देते. त्यामुळे मंदिरांत भ्रष्टाचार होतो आणि मंदिरांची सात्त्विकताही नष्ट होत आली आहे ! हिंदु राष्ट्रात चांगल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !’

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !

‘चर्च आणि मशीद येथे धर्मशिक्षण दिले जाते. याउलट मंदिरात केवळ दर्शन घेतात; म्हणून धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची स्थिती वाईट झाली आहे.’

आतंकवाद्यांची ‘दहशत’ !

आतंकवाद्यांची ‘दहशत’ !

‘विमाने, रॉकेट, बाँब इत्यादींच्या बळावर नाही, तर तयार केलेल्या आतंकवाद्यांच्या बळावर आतंकवादी जगातील सर्व देशांत भीती निर्माण करत आहेत !’

तरुणांनो, भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा !

तरुणांनो, भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा !

‘तरुणांनो, आपले आई-वडील भ्रष्टाचार करून पाप करत असले, तर त्यांना पुढील पापांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा ! पतीचा भ्रष्टाचार, अनैतिक वागणे इत्यादी उघड करणे, हे पत्नीचेही राष्ट्राच्या संदर्भातील कर्तव्य आहे.’

हिंदूंची मंदिरे सरकारी कह्यात का ?

हिंदूंची मंदिरे सरकारी कह्यात का ?

‘एकाही सरकारी खात्याचा कारभार योग्य किंवा परिपूर्ण नसतांना हिंदूंची मंदिरे सरकारी कह्यात का ?’

खरा न्याय केवळ सूक्ष्मातील कळणारे संतच करू शकतात !

खरा न्याय केवळ सूक्ष्मातील कळणारे संतच करू शकतात !

‘हल्लीच्या काळातील न्याय हा केवळ पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे दिला जातो; परंतु या पद्धतीमध्ये अनेक त्रुटी रहात असल्याची उदाहरणे वाचण्यात येतात. साधना करून संतपदाला पोचलेल्यांना सूक्ष्मातील कळू लागते. त्याच्या आधारे असे संतच खरा न्याय देऊ शकतात.’

हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे हे आहे कारण

हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे हे आहे कारण

मुसलमानांना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मसाठी लढायला लहानपणापासून शिकवतात; म्हणून ते जगभर त्यांचा प्रभाव पाडतात. याउलट हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’

हे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !

हे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या विषयावर अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’