‘साधना केली (देवाचे केले) आणि हानी झाली (नुकसान झाले)’, असे जगात एकतरी उदाहरण आहे का ?

‘आपल्या जन्माचा उद्देश ‘प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि आनंदप्राप्ती (ईश्‍वरप्राप्ती) करणे’ हा आहे. याचा आज मानवाला पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळे ‘साधना करणे, म्हणजे जीवन वाया घालवणे’, असे त्यांना वाटते. याविषयी पूर्णवेळ साधकाचे अनुभव ऐकून ‘गुरु आणि ईश्‍वर अशा साधकांची कशी काळजी घेतात ? आणि त्याला सर्वोच्च
सुख, म्हणजेच आनंद कसा प्राप्त करून देतात ?’, हे शिकता येईल.

भार्गवश्री बी.पी. सचिनवाला (वसई) यांच्‍या श्री परशुराम तपोवन आश्रमाला सनातनच्‍या सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची सदिच्‍छा भेट !

भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांच्‍या पालघर जिल्‍ह्यातील वसई तालुक्‍यातील मेेढे या गावातील श्री परशुराम तपोवन आश्रमात सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी २६ सप्‍टेंबर या दिवशी सदिच्‍छा भेट दिली.

ब्रह्मीभूत स्‍वामी वरदानंद भारती यांची ‘वरदवाणी’ !

शासनकर्ता दुःखाला, कष्‍टाला, संकटाला वा लोकांमध्‍ये होऊ शकणार्‍या अप्रियतेला कंटाळून हानीचे भय बाळगणारा आणि त्‍यामुळे वाटले तसा वागणारा असा राजा नसावा. तो खर्‍या अर्थाने धर्मनिष्‍ठ असावा.

‘साधकांनी आश्रमात हिंदु राष्ट्राची अनुभूती कशी घ्यायची ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

ही हिंदु राष्ट्राची व्यष्टी अनुभूती झाली. ही अनुभूती समष्टी स्तरावरही सर्वांनाच यायला हवी, यादृष्टीने सनातनच्या सर्व आश्रमांतील साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु  डॉ. आठवले

साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे लाभलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन आणि त्‍यांच्‍या वाणीतील चैतन्‍य यांमुळे साधनेचे प्रयत्न होऊन साधिकेला स्‍वतःत जाणवलेले पालट !

सद़्‍गुरु काकांनी सांगितले, ‘‘आपली प्रत्‍येक कृती साधना म्‍हणून व्‍हायला पाहिजे.’’ या विचारामुळे माझे परम पूज्‍य गुरुदेवांशी अनुसंधान वाढले आहे.

श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर १ सहस्र संत ५ लाख हिंदूबहुल गावांत जाऊन कार्यक्रम करणार !

आयोजकांनी म्हटले की, देशातील ५५० जिल्हे आणि ५ लाख गावांमध्ये हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे. आम्ही केवळ त्यांच्यापर्यंत पोचू इच्छितो.

स्‍वामी वरदानंद यांची ‘वरदवाणी’ !

धर्मस्‍थापनेसाठी करावे लागणारे राजकारण कुशलतेने करावे लागते. त्‍याचा महान आदर्श श्रीकृष्‍णाने आपल्‍या वर्तनाने निर्माण केला आहे. ‘दुष्‍ट घातकी दुर्जनांशी ‘जशास तसे’ हीच नीती’, हे लक्षात न ठेवल्‍यामुळेच आपल्‍या राष्‍ट्राची अपरिमित हानी झाली आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन

स्वसुखाच्या अपेक्षेतून इतरांकडून केलेली अपेक्षा किंवा इच्छा जी स्वतःच्या जीवनात दुःख आणि अज्ञान निर्माण करते, तीच ‘आसक्ती’ असते.