सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून ७८७ वीजग्राहकांनी एकूण ६५ लाख ८० सहस्र रुपये थकबाकी भरली 

वीजदेयके वेळीच न भरल्याने रत्नागिरी परिमंडलातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकूण ३१ सहस्र १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता.

मत्स्यव्यवसाय विकासासाठी भारतातील पहिले एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न !

राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनार्‍यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

पावणे ३ कोटी रुपयांच्या मद्याची पोलिसांकडून विल्हेवाट

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. या कारवाईच्या वेळी कह्यात घेतलेल्या मद्याची न्यायालयाच्या आदेशानंतर विल्हेवाट लावली जाते.

भारतीय नौदलाची आय.एन्.एस्. ‘गुलदार’ नौका विजयदुर्ग बंदरात दाखल 

भारत सरकारने भारतीय नौदल सेवेतून निवृत्त झालेली आय.एन्.एस्. ‘गुलदार’ ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (MTDC) सुपुर्द केली आहे.

ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी २ महिने वेतनापासून वंचित 

ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या जिल्ह्यातील १२० हून अधिक स्थानिक कर्मचार्‍यांना गेल्या २ महिन्याचे मानधन ‘स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि.’ या पुणे येथील ठेकेदार आस्थापनाने दिलेले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले स्मारक झरेबांबर येथे उभारले !

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलीदानातून प्रेरणा मिळावी आणि धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी धर्मवीर बलीदान मासात तालुक्यातील झरेबांबर तिठा येथे एका रात्रीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक शिवशंभू प्रेमींनी उभे केले.

माटणे येथे मातीचा साठा केलेल्या भूमीच्या मालकाला महसूल विभागाने ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला !

तालुक्यातील माटणे येथे मोठ्या प्रमाणात दिसलेल्या मातीच्या साठ्याची छायाचित्रे काढणार्‍या तालुक्यातील ३ पत्रकारांना धमकावण्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी मातीचा साठा ज्या भूमीत करून ठेवला होता

दगडांच्या खाणींच्या विरोधातील खानयाळे ग्रामस्थांचे उपोषण ८ दिवसांनी मागे 

तिलारी धरणाच्या जवळ जुने शिरंगे येथे चालू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी चालू केलेले साखळी उपोषण आंदोलनाच्या आठव्या दिवशी, म्हणजे १३ मार्च या दिवशी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले. 

सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्‍ह्यांत खनिज तेलाचे साठे सापडले !

अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्‍ह्यांच्‍या सागरी क्षेत्रांत खनिज तेलाचे नवे साठे सापडले आहेत. अरबी समुद्रात ८ वर्षांपासून याविषयी संशोधन चालू होते. त्‍याला आता यश आले आहे.

‘PM Kisan List. APK’ या लिंकचा वापर न करण्याचे शेतकर्‍यांना आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम्. किसान योजना) कृषी विभागाद्वारे राबवण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत शेतकर्‍यांच्या भ्रमणभाषवर ‘PM Kisan List. APK’ किंवा  ‘Pm Kisan APK’ या लिंकचा संदेश येतो.