विनामास्क ३१ डिसेंबर साजरा करणार्‍यांवर कारवाई

३१ डिसेंबर साजरा करतांना विनामास्क असणार्‍या १३ सहस्र १७९ जणांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत २६ लाख ३५ सहस्र ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शेतकर्‍याला महावितरणने ५ सहस्र १४८ रुपये भरपाई आणि वीज जोडणी त्वरित देण्याचा ग्राहक तक्रार निवारण मंचचा निकाल 

वीज वितरण सारख्या आस्थापनाने निधी नसल्याने जोडणी देता येत नाही, असे सांगणे हास्यास्पद आहे. असे असेल तर घेतलेल्या अनामत रकमेचे काय केले, तेही आस्थापनेने सांगितले पाहिजे.

अंबरनाथ येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त श्री. विनायक जोशी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.

बांगलादेशने १ सहस्र ७७६ शरणार्थी रोहिंग्यांची केली बेटावर रवानगी !

हे बेट भूभागापासून ३४ कि.मी.वर अंतरावर आहे. हे बेट पावसात नेहमी बुडून जात असल्याने बांगलादेशने बेटावर तटबंदी केली आहे. यासह तेथे घरे, रुग्णालये, मशिदीही बांधल्या आहेत.

रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

भारतीय संस्कृतीनुसार सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण करण्यास सांगितलेले आहे, ते किती योग्य आहे, हे या संशोधानातून लक्षात येते; मात्र भारतियांनाच याचे महत्त्व समजेलेले नाही, हे त्यांना लज्जास्पद !

पाकमधील हिंदु मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ३० धर्मांधांना अटक

घटनेच्या ३ दिवसानंतर केंद्र सरकारने विरोध नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने ‘पाकच्या अंतर्गत प्रश्‍नांत हस्तक्षेप नको’, असाही विचार केला असेल; मात्र हा अंतर्गत प्रश्‍न नाही, तर हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !

ऐतिहासिक बाणगंगेच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जलस्रोत बाधित करणार्‍या खोदकामाला स्थगिती

बाणगंगा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. ही संस्कृती टिकवली पाहिजे. बांधकाम व्यावसायिक येथे रात्रीचे काम करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल. जोपर्यंत याविषयीचा अहवाल येत नाही, या कामाला स्थगिती देण्यात येईल – महापौर, मुंबई

एटा (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी महिलेची सरपंचपदी निवड झाल्याच्या वर्षभरानंतर प्रशासनाला जाग !

भारतीय प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी लज्जास्पद घटना ! जगात कुठल्याही देशात अशा घटना घडत नाहीत, ज्या भारतात घडतात, हे संतापजनक ! याला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चा समर्थक लिस्टर आल्फोन्सोच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट

‘गोवा वेगळे राष्ट्र बनवता येते का ?’, अशी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचे प्रकरण : अशा फुटीरतावाद्यांच्या संघटनेवर बंदी का घालू नये ? या संघटनेमागे आंतरराष्ट्रीय शक्ती कोणती आहे, याचे अन्वेषण व्हावे !

मेंदूवरील शस्त्रकर्माच्या वेळी रुग्ण महिलेकडून श्रीमद्भगवद्गीतेच्या श्‍लोकांचे पठण !  

आपत्काळात हिंदूंनी अशी श्रद्धा ठेवून ईश्‍वरी अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न केला, तर ईश्‍वर त्यांचे रक्षण नक्कीच करील; मात्र त्यासाठी अतापासून प्रयत्न चालू केले पाहिजेत !