दुबई ४ दिवसानंतरही ठप्प !

४ दिवसानंतरही येथील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे येथे साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे दुबई ठप्प आहे.

श्रीरामनवमीला गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण होऊनही त्यांनी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले !

हिंदूंच्या सणांच्या दिवशीच गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? याची कल्पना येते.

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे ४० टक्के सर्वेक्षण पूर्ण

आतापर्यंत सर्वेक्षणातून अनेक मूर्ती, स्तंभ आणि हिंदूंची धार्मिक चिन्हे असलेल्या कलाकृती सापडल्या !

मोशी, चिखली (पुणे) येथे ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’चा श्रीरामनवमी उत्सव !

ज्ञानवापी सर्वेक्षणात शेवटच्या काही कालावधीमध्ये साक्षात् काशीमुक्तेश्वर अवतरले. जेव्हा देवता अवतरित होतात, तेव्हा धर्मराज्य येणार आहे, हे ओळखावे अन् तेच रामराज्य आता येणार आहे.

पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस !

होर्डिंग कोसळल्याचा प्रकार गंभीर आहे. वाघोलीत अनेक होर्डिंग आहेत. त्यांचे त्वरित ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

पुणे येथील ‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’कडून ‘आर्.टी.ई.’तील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचा आरोप !

‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’च्या मुख्याध्यापिका वैजयंता पाटील म्हणाल्या, ‘‘पुन्हा घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसवले आहे.

नाशिक येथे अवैध सावकार वैभव देवरे याने भाजप पदाधिकार्‍याकडून २० लाख रुपयांच्या बदल्यात ३ कोटी रुपयांची वसुली केली !

देवरे याच्या विरोधात प्रविष्ट होणार्‍या तक्रारींनुसार या गुन्ह्याची व्याप्ती १०० कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे.

महाराष्ट्रात लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान ५४.८५ टक्के !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल या दिवशी पार पडले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा अर्ज प्रविष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांत केलेले काम हा केवळ ‘ट्रेलर’ होता. ते तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देश महासत्ता बनेल.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान

देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला २१ राज्यांतील १०२ जागांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बंगालमध्ये सर्वाधिक ७७ टक्के, तर बिहारमध्ये केवळ ४६ टक्के मतदान झाले.