गोव्याची खरी ओळख जगभर पोचवणे आवश्यक ! – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

गोव्याच्या इतिहासावर सखोल अभ्यास करून तो लोकाभिमुख करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

श्रीलंकेमध्ये महिला अधिवक्त्याकडून फेसबूकवर श्री महाकाली देवीचे अश्‍लील चित्र पोस्ट करून अवमान

केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

कोरोनाची नियमावली डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

अनुमती देण्यापूर्वी या परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल झाली होती, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे जनतेला वाटते !

(म्हणे) ‘ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध असल्याने ती प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही !’ – बसपचे उत्तरप्रदेश प्रमुख भीम राजभर यांचा दावा

योगगुरु रामदेवबाबा यांच्या औषधाला त्यांच्या आस्थापनाने ‘कोरोनावरील औषध’ संबोधल्याने त्यावर बंदी घालणारे प्रशासन आता अशांवर काय कारवाई करणार आहे ?

स्वराज गोमंतक संस्थेकडून वेर्ला येथे महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर

गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून ‘स्वराज गोमंतक’ या संघटनेकडून समाजासाठी विशेषतः महिला आणि युवती यांच्यासाठी अनिवासी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. वेर्ला-काणका येथील सातेरीनगर क्रीडा मैदानात १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२० या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले.

वणी (यवतमाळ) येथील भालर शिवारात वाघांची दहशत

प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढून गावकर्‍यांना वाघांच्या दहशतीपासून मुक्त करावे !

हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे.

भारतियांची नैतिकता रसातळाला ?

अमेरिकेत विवाहबाह्य संबंधांना ऊत आल्यावर तेथील सरकारने ‘बॅक टू फॅमिली’, ‘बॅक टू मदरहूड’ यांसारख्या चळवळी चालू केल्या. लोकांना लग्न टिकवण्यासाठी आवाहन केले. असे आवाहन भारतियांना करावे लागू नये, यासाठी विकृत मालिका, चित्रपट यांवर निर्बंध घालण्यासमवेत लोकांना नैतिकता वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

आरक्षणाचा अधिकार असणारे गुणवान उमेदवार खुल्या प्रवर्गातूनही पदासाठी अर्ज करू शकतात ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नोकरीमध्ये पद भरण्यासाठी उमेदवारांच्या जातींऐवजी त्यांच्या योग्यतेकडे लक्ष दिले पाहिजे आणि गुणवत्ता असणार्‍या उमेदवारांना साहाय्य केले पाहिजे. कोणत्याही स्पर्धेमध्ये नेहमीच योग्यतेवरच उमेदवाराची निवड झाली पाहिजे.

पाकपेक्षा भारतात मुसलमान अधिक असल्याने त्यांना देण्यात आलेला अल्पसंख्यांक दर्जा रहित करा ! – खासदार साक्षी महाराजांची मागणी

केंद्रात साक्षी महाराज यांचाच पक्ष सत्तेत असल्याने त्यांनी ही मागणी मार्गी लावण्यासाठी सरकारचा पाठपुरावा घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !