कोरोनाच्या विरोधातील लस घेणे ऐच्छिक ! – केंद्र सरकार

एखाद्याला पूर्वी कोरोनाची लागण झाली असेल किंवा नसेल, तरीही लसीची पूर्ण मात्रा घेणे आवश्यक आहे, तरच विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आवश्यक त्या अँटिबॉडीज निर्माण होतात.

संस्कृतला राष्ट्रीय भाषा घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !

विश्‍वविद्यालये आणि महाविद्यालये यांठिकाणी देशी गायीच्या पालनाचे महत्त्व शिकवण्यावर वेबिनारमध्ये चर्चा !

गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

श्री महालक्ष्मी मंदिराच्या शिखरावर ५ फूट उंचीचा १ हजार टनचा धोकादायक कोबा ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

५० वर्षांपूर्वी योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांनी मंदिरातील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केला असेल. परंतु आता ही स्थिती अधिक धोकादायक वळणावर आली आहे !

रंगकाम करण्यासाठी लवकरच बाजारात येणार गायीच्या शेणापासून बनवलेले वेदिक रंग ! – नितीन गडकरी

भारतीय प्राचीन पद्धतीकडे आता समाज वळू लागला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे; मात्र गायीचे शेण मिळण्यासाठी प्रथम गायी जिवंत रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे ?, हेही गडकरी यांनी जनतेला सांगायला हवे, असे हिंदूंना वाटते !

बिहारच्या लोकगायिका मैथिली ठाकूर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्यास नकार

देवाने दिलेली कला ही केवळ त्यालाच समर्पित केल्यास त्यातून आध्यात्मिक उन्नती होते. त्याचा वापर भौतिक प्राप्तीसाठी केल्यास व्यवहारिक प्रगती होते !

कर्नाटकमध्ये हनुमान मंदिरासाठी बाशा नावाच्या मुसलमान व्यक्तीने दिली दीड गुंठे भूमी दान !

प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला ठळक प्रसिद्धी दिली; मात्र जेव्हा धर्मांध हे हिंदूंच्या मंदिरांवर, धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करतात, तेव्हा अशी वृत्ते दडपली जातात, हे लक्षात घ्या ! बाशा यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावरील माहिती आवेदनात ‘ब्राह्मण – ब्राह्मणेतर’ असा उल्लेख

शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ संकेतस्थळावर शालेय विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येते. पूर्वी या माहिती आवेदनात सर्व जातींचा उल्लेख होता; परंतु आता त्या आवेदनात ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मणेतर’ असा उल्लेख आढळला आहे.

समाजाला सत्य देण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘टी.आर्.पी.’च्या नावाखाली वाटेल, ते दाखवले जाते. ते बंद व्हायला हवे. तसे होता कामा नये. सध्या वृत्तवाहिन्यांची जी स्पर्धा चालू आहे, त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, ते समाजाला देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

दुचाकी वाहनांना आरसा नसल्यास  ५०० रुपये दंड

यापुढील काळात दुचाकी वाहनांना आरसा नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कागदपत्रे, विमा पॉलिसीसह वाहनांना आरसे बंधनकारक आहेत. सध्या वाहनांच्या संख्येत विक्रमी संख्येने वाढ होत आहे.