हेरगिरी करणारी चीनची नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोचली !

भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेने अनुमती दिल्यानंतर चीनची ‘युआन वांग-५’ ही हेरगिरी करणारी नौका १६ ऑगस्टला सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोचली. ही नौका २२ ऑगस्टपर्यंत तेथे असेल. ही हेरगिरी नौका जवळपास ७५० किलोमीटर अंतरावरील टेहळणी करू शकते.

सलमान रश्दी यांच्यावरील आक्रमणात आमचा हात नाही ! – इराण

न्यूयॉर्क येथे १२ ऑगस्टला एका कार्यक्रमात भारतीय वंशाचे मूळचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणात आमचा हात नाही, असा खुलासा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.

पाकिस्तानमध्ये एका विश्‍वविद्यालयातील स्पर्धेमध्ये फडकावण्यात आला भारताचा राष्ट्रीय ध्वज !

या विश्‍वविद्यालयातील एका स्पर्धेमध्ये शहरातील शहिदा इस्लाम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून हा झेंडा फडकावण्यात आला; मात्र लगेच त्याला रोखण्यात आले. हे विद्यार्थी एकेका देशाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यात भारताचाही समावेश होता.

योगी देवनाथ यांना धर्मांधाकडून शिरच्छेद करण्याची धमकी

गुजरातमधील हिंदु युवा वाहिनीचे माजी प्रदेशाध्यक्ष योगी देवनाथ यांना सामाजिक माध्यमांद्वारे ठार मारण्याची ‘सलीम अली’ या ट्विटर खात्यावरून  देण्यात आली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील पाकिस्तानी आतंकवाद्यावरील निर्बंधाच्या प्रस्तावाला चीनचा विरोध

चीन स्वतः उघूर मुसलमानांवर अत्याचार करत आहे,  तर अन्य देशांतील जिहादी आतंकवाद्यांचा बचाव करत आहे, हा चीनचा दुटप्पीपणा आहे !

दोन्ही देशांत चर्चा होईपर्यंत चीनने त्याची गुप्तहेर नौका श्रीलंकेत पाठवू नये !

सध्या ही नौका तैवानजवळील समुद्रात आहे. या नौकेवर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ही नौका श्रीलंकेत पोचली, तर ती तेथून भारतातील काही ठिकाणांची टेहाळणी करून संवेदनशील माहिती गोळा करू शकते.

पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’ वसाहतीतील एकही झाड तोडू नका !

‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने अडचण ठरणार्‍या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली होती. छाटणीच्या नावाखाली आरेमध्ये अवैधरित्या झाडे तोडल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात संघ ब्रिटिशांच्या बाजूने राहिला !’

तत्कालीन काँग्रेसचे धोरण पहाता सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांसारखे काही नेते वगळता नेहरू आणि त्यांचे पाठीराखे काँग्रेसवाले ब्रिटिशांचे हस्तक असल्यासारखेच वागत होते. रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ‘राष्ट्राभिमानी’ हीच ओळख आहे.

हिंदूंच्या विरोधानंतर ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असे केले !

हिंदूंच्या संघटितपणाचा विजय ! हिंदू आता जागृत होऊन देवतांच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत, हे अभिनंदनीय आहे. अशा प्रकारे सर्वत्रचे हिंदू जागृत झाल्यास कुणीही हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान करू धजावणार नाही !

कोरोनाचे लसीकरण अभियान संपल्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कोरोना लसीकरण अभियान संपल्यानंतर लगेचच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.