‘शक्तीपीठ महामार्गा’ला एक इंचही भूमी देऊ नका ! – राजू शेट्टी
‘प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी शेतकर्यांनी एक इंचही भूमी देऊ नये. सरकार आपली शेती कह्यात घेणार आहे. शेती संपली, तर आपण काय भीक मागणार का? त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणार्या यंत्रणेला पळवून लावा’, असे आवाहन ‘शेतकरी संघटने’चे राजू शेट्टी यांनी केले.