|

सांगली, २५ एप्रिल (वार्ता.) – पहलगाम येथे धर्म विचारून हिंदूंची हत्या केल्याच्या निषेधार्थ २५ एप्रिल या दिवशी हिंदु एकता आंदोलन आणि विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अपर तहसीलदार कार्यालय येथे श्रद्धांजली अन् निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी प्रथम मृत्यूमुखी पडलेल्यांना हिंदुत्वनिष्ठांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संतप्त हिंदुत्वनिष्ठांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी ‘जलादो जलादो पाकिस्तान जलादो, बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं, गर्व से कहो हम हिंदु हैं, जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान’ असे फलक घेऊन याच घोषणा जोरदार दिल्यानंतर संपूर्ण परिसर दणाणून गेला.

‘पृथ्वीतलावरून आतंकवादी ‘पाकिस्तान’ या देशाचे नाव पुसून टाका. इस्लामी आतंकवाद्यांच्या आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे साहाय्य तातडीने द्यावे, तसेच काश्मीर आणि पाकिस्तानात लपलेल्या इस्लामी आतंकवाद्यांना घुसून गोळ्या घालून ठार मारावे’, अशा मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. आंदोलनाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर भगवी टोपी घातली होती.
आता हिंदूंनीही शस्त्र सज्ज झाले पाहिजे ! – अधिवक्ता बाळासाहेब देशपांडे
विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता बाळासाहेब देशपांडे म्हणाले, ‘‘मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांना सरकारने दिलेले साहाय्य तुटपुंजी आहे. ते ५ लाख रुपयेऐवजी ५० लाख रुपये देण्यात यावे. वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचा प्रारंभ आता झालेला आहे. त्यामुळे आता हिंदूंनीही शस्त्रसज्ज झाले पाहिजे.’’
आतंकवाद्यांनी प्रारंभ केला आहे, त्याचा शेवट हिंदूंनी करावा ! – नितीन शिंदे
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने पाकिस्तानचे पाणी बंद करण्याचे काम केलेले आहे. आता अन्नपुरवठा बंद करा. ‘एअर स्टाईक, सर्जिकल स्ट्राइक’प्रमाणे पाकिस्तानमध्ये घुसून लपलेल्या ठिकाणी इस्लामिक आतंकवाद्यांना गोळ्या घालून ठार मारा. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या समवेत क्रिकेटचे सामने होऊ देऊ नका. ते उधळून लावा. हिंदूंनो प्रारंभ इस्लामिक आतंकवाद्यांनी केलेला आहे. त्याचा शेवट आपल्याला करायचा आहे.’’
उपस्थित मान्यवर…
या आंदोलनामध्ये सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह श्री. नितीन देशमाने, अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे, भाजपचे श्री. पृथ्वीराज पवार, सर्वश्री अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, सोमनाथ गोटखिंडे, रवींद्र वादवणे, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, श्रीकांत शिंदे, प्रकाश चव्हाण, प्रकाश बिरजे, सचिन पवार आदी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सर्वश्री अविनाश मोहिते, संजय जाधव, श्रीराम कुलकर्णी, दत्ता भोकरे, मनोज साळुंखे आदींची भाषणे झाली.