पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्यासारखे देशप्रेम स्वतःतही जागृत करूया ! – स्वाती एम्.के., हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीद्वारे बेंगळुरू (कर्नाटक) येथे पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने शौर्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा वृत्तांत . . .

पाक नागरिकांना ‘आतंकवादी’ म्हटल्यावरून ‘रिपब्लिक भारत’ वाहिनीला १९ लाख ७३ सहस्र रुपयांचा दंड

पाकमधील २२ कोटी मुसलमांना आतंकवादी संबोधल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली जाते; मात्र भारतात १०० कोटी हिंदूंना वारंवार आतंकवादी संबोधले जाऊनही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी अवाक्षरही काढत नाही !

ओशेल, शिवोली येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव !

ओशेल, शिवोली, बार्देश, गोवा येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी, २३ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने या देवस्थानाविषयी माहिती देणारा लेख प्रसिद्ध करत आहोत.

अमेरिकेतील विद्यापिठामध्ये हिंदु धर्म आणि जैन पंथ यांच्या अभ्यासासाठी पिठाची स्थापना !

अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयी अभ्यास केला जातो आणि त्यासाठी पिठाची स्थापना केली जाते. भारतात मात्र शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर कथित निधर्मीवादी, बुद्धीवादी आणि पुरोगामी याला विरोध करतात !

अलिगड मुस्लिम विश्‍वविद्यालय म्हणजे ‘छोटा भारत’ ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांना जे वाटते ते या विश्‍वविद्यालयातील काही धर्मांध विद्यार्थ्यांना वाटत नाही. अशांचा बंदोबस्त व्हायला हवा !

भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात साहाय्य करावे ! – बलुची संघटनांचे आवाहन

बलोच नॅशनल मूव्हमेंटच्या ब्रिटनमधील शाखेने आणि तिच्याशी संबंधित संघटनांनी पाकमध्ये बलुच लोकांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्याची भारत सरकारकडे मागणी केली आहे. या संघटनांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात साहाय्य करण्याचेही आवाहन केले आहे.

डिचोली येथील श्री शांतादुर्गादेवीचा ‘नवा सोमवार’ उत्सव

संपूर्ण विश्‍वाला ताप देणार्‍या असुरांचा नाश केल्यानंतर दैत्यांच्या नाशार्थ मारक रूप धारण केलेल्या श्री शांतादुर्गादेवीने गोमंतकात येऊन शांत, तारक रूप धारण केले. तेव्हापासून तिला श्री शांतादुर्गा असे संबोधण्यात येऊ लागले.

श्रीलंकेपासून शिका, तर चीनपासून सावध रहा ! – भारताची नेपाळला चेतावणी  

नेपाळनेच नाही, तर भारतानेही सावध रहाण्याची आवश्यकता आहे ! तसे न राहिल्यानेच चीनने पेंगाँग तलावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केली आहे, ही वस्तूस्थिती आहे !

‘बिग बॉस’मधून मनोरंजन नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो  ! – अभिनेत्री शमिता शेट्टी  

असे कार्यक्रम भारतात प्रसारित होतात आणि कोट्यवधी लोक ते पहातात; मात्र  काही ठरावीक समाजप्रेमी वगळले, तर कुणीही त्याचा विरोध करत नाही, हे भारतियांना लज्जास्पद !

समाजाला सत्य देण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘टी.आर्.पी.’च्या नावाखाली वाटेल, ते दाखवले जाते. ते बंद व्हायला हवे. तसे होता कामा नये. सध्या वृत्तवाहिन्यांची जी स्पर्धा चालू आहे, त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, ते समाजाला देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.