पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविश्‍वसनीय कार्य करत आहेत ! – जेमी डिमॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘जेपी मॉर्गन’ बँक, अमेरिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासाठी अविश्‍वसनीय कार्य करत आहेत. मोदी यांना भारतातील प्रसारमाध्यमे विरोध करत असतांनाही त्यांनी ४० कोटी भारतियांना दारिद्य्रातून बाहेर काढण्याचे महत्कार्य केले आहे.

Malaysia Helicopters Hit : मलेशियामध्ये २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू !

मलेशियामध्ये सैन्यदलाच्या २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  मलेशियामध्ये ‘रॉयल मलेशियन नेव्ही’चा वार्षिक कार्यक्रम होता.

गोवा : केरी येथे पार पडला श्री विजयादुर्गा देवस्थानचा सुवर्ण शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव !

‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या संगणकयुगातील दैनंदिन जीवनात नवनाथांचा आधार अनुभवा ! – नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके

नवनाथांनी अवतार घेऊन तप सामर्थ्याचे अलौकिक दर्शन घडवत आपल्यास जीवनोपयोगी संदेश दिले आहेत. ‘या संदेशरूपाने नवनाथांचा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या’, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.

पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून शोभायात्रेद्वारे नववर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत !

पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून आणि शोभायात्रेद्वारे नववर्षाचे नागरिकांनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय शहरातील छोट्या आणि मोठ्या मंदिरांत फुलांची आरास करण्यात आली होती. नागरिकांनी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती.

बंगालमध्ये सीएए, एन्.आर्.सी. आणि समान नागरी कायदा लागू करू देणार नाही ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

संसदेने संमत केलेले कायदे लागू करू देणार नाही, म्हणणार्‍या ममता बॅनर्जी लोकशाहीद्रोही आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचे सरकार केंद्र सरकारने तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे !

उरुळी कांचनजवळील (पुणे) भवरापूर येथे ‘अंनिस’चा ‘स्मशान भेट’ कार्यक्रम !

भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत !

GITM 2024 :  पर्यटनस्थळाच्या मूळ संस्कृतीचा यथोचित सन्मान अन् प्रसार करणे आवश्यक !

कोणतेही पर्यटनस्थळ महान बनवणे एकट्याचे काम नाही. हे कार्य सरकार, स्थानिक जनता आणि खासगी क्षेत्र यांचे सामूहिक दायित्व आहे.

समुद्रकिनारे आणि ‘पार्टी लाईफ’ यांच्या पलीकडे पर्यटनाला व्यापक स्वरूप देणे आवश्यक ! – सुनील आंचिपाका, संचालक, गोवा पर्यटन विभाग

समुद्रकिनारे (बीच) आणि ‘पार्टी लाईफ’ (मेजवान्या करणे) यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या पर्यटनाला व्यापक रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, आस्थापने यांच्यासह जनतेच्या मानसिकतेतही पालट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.