काँग्रेसवाल्यांनीच नेताजी बोस यांची हत्या घडवून आणली ! – खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

उन्नाव (उत्तरप्रदेश) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वेळेपूर्वीच मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आले होते. माझा आरोप आहे की, काँग्रेसच्या लोकांनीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली.

त्यांच्या लोकप्रियतेसमोर तर पंडित नेहरूही कुठेच उभे राहू शकत नव्हते. म. गांधीही काहीच नव्हते, असे विधान येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

(सौजन्य : ANI News official)

साक्षी महाराज पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य मागितल्यावर ते देऊन टाकायला इंग्रज एवढे सरळ नव्हते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते, ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगा ।’ रक्ताची किंमत चुकवून आपण स्वातंत्र्य मिळवले होते.