हम दो हमारे पांचचा संकल्प करून मुलांना शस्त्र विकत घेऊन चालवायला शिकवा ! – भाजपच्या नेत्याचे आवाहन

  • अनेक मुले जन्माला घालण्यापेक्षा आता आहेत त्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी कसे बनवता येईल, हे पहायला पाहिजे !
  • पांडव संख्येने अल्प होते, तरी ते कौरवांच्या विरोधातील युद्ध जिंकले; कारण त्यांना भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद होता. त्याप्रमाणे हिंदूंची संख्या वाढवून समस्या सुटणार नाही, तर हिंदू संख्येने अल्प असले, तरी त्यांना ईश्‍वराचे अधिष्ठान असले, तरी ते धर्मांध शक्तींमुळे निर्माण झालेल्या संकटांना पुरून उरतील, हेच खरे !
विनीत अग्रवाल शारदा

मेरठ (उत्तरप्रदेश) – जोपर्यंत कुटुंबनियोजनाच्या संदर्भातील नियम बनवला जात नाही तोपर्यंत आपण ‘हम दो हमारे पाच’चा संकल्प केला पाहिजे. जोपर्यंत कुटुंबनियोजनाचा ठोस नियम सिद्ध केला जात नाही, तोपर्यंत ‘हम दो हमारे दो’चा सिद्धांत संपवला पाहिजे, असे विधान भाजपच्या व्यापार विभागाचे उत्तरप्रदेशमधील संयोजक विनीत अग्रवाल शारदा यांनी येथे प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.

शारदा यांनी म्हटले की,

१. या ५ मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावे. एका मुलाला मान, मर्यादा आणि प्रतिष्ठा यांचे संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करणे आणि ते चालवणे शिकवावे. एका मुलाला भारतीय सैन्यात पाठावे. एकाला व्यापारी करावे आणि एका मुलाला आय.ए.एस्. किंवा पी.सी.एस्. बनवून भारतियांच्या सेवेसाठी सक्षम करावे.

२. महाराज दशरथ यांना ४ पुत्र नसते, तर आजही रावणाचे राज्य संपुष्टात आले नसते. त्यामुळेच देशात ‘हम दो हमारे पाच’ची आवश्यकता आहे. असे झाले नाही, तर भारतमाता पुन्हा एकदा रडेल. भारतमाता पुन्हा एकदा बेड्यांमध्ये अडकेल आणि पुन्हा एका पाकिस्तानची मागणी केली जाईल. त्यामुळेच भारत मातेला नमन करतांना मी ‘हम दो हमारे पाच’चे समर्थन करतो.