भारतियांच्या उच्च वारशाचा, संस्कृतीचा दृष्टांत झालेले ख्रिस्ती गोमंतकीय तेलु दे माश्कारेन्यश !
युरोपीय संस्कृतीपेक्षा आपली भारतीय संस्कृती प्राचीन असल्याची जाणीव त्यांना झाली. ही संस्कृती सहिष्णु आहे, वैचारिक स्वातंत्र्य आहे, याचा त्यांना अभिमान वाटला आणि पारतंत्र्यात पडल्यामुळे ही तेजहीन होत असल्याविषयी त्यांना खंतही वाटली