वारकर्‍यांची असुविधा टाळण्यासाठी ग्रामस्थांकडून ‘आळंदी बंद’ मागे !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजपासून आरंभ झाला; मात्र आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीकरांनी ५ डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती.

तणावमुक्तीसाठी भगवंताचे नामस्मरण करायला हवे ! – पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार

‘रामकृष्णहरि’ नामस्मरण. हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा, त्यामुळे तणावातून मुक्तता मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे, अशी भावना आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली.

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थान येथील मारहाणप्रकरणी धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये मुसलमानांकडून वारकर्‍यांवर आक्रमण करण्यात आले होते.

दिंडीसाठी ‘प्लॉट’ वाटपाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल ! – उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

एका दिंडीला केवळ ३ दिवस ‘प्लॉट’ (जागा) देणे अपेक्षित आहे. त्यामुळे ६५ एकर मधील प्लॉट कायमस्वरूपी निश्चित करून त्यांची नोंद करण्यात यावी आणि भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करण्यासाठी सहकार्य करावे

कार्तिक एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ घंटे दर्शन !

यात्रा कालावधीत ८ ते १० लाख वारकरी येतील, प्रत्येक घंट्याला अडीच ते तीन सहस्र वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील, या दृष्टीने प्रशासनाने सिद्धता केली आहे.

कीर्तन जिहाद ?

‘सबका मालिक एक है ।’ असे म्‍हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्‍या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्‍मद रसूलुल्लाह’, असे म्‍हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदु भाविकही त्‍याचे अनुसरण करत होते.

इंद्रायणी नदीच्‍या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्‍या आरोग्‍याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादीकाँग्रेस

आळंदी तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदीमध्‍ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. आळंदी येथे येणार्‍या लाखो वारकर्‍यांना हे दूषित पाणी प्‍यावे लागते.

पंढरीच्या वाटेवर दिंड्यांना शिधा पुरवणारा मिलिंद चवंडके हा मुलुखावेगळा प्रवचनकार ! – ह.भ.प. सतीश महाराज निमसे

आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या दिंड्यांना अनेकजण अन्नदान करतात; पण दिंड्यांमागे थेट टेंभूर्णीपर्यंत येऊन किराणा साहित्यासह उपवासासाठी फराळाचे विविध प्रकार अगदी दूधही पुरवून वारकर्‍यांशी समरस होणारे मिलिंद चवंडके हे महाराष्ट्र राज्यातील मुलूखावेगळे प्रवचनकार आहेत, असे कौतुकोद्गार ह.भ.प. सतीश महाराज निमसे यांनी काढले.

तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्‍त’ करा !

‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांप्रमाणे महाराष्‍ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रांसह सर्व मंदिरांचा परिसर १०० टक्‍के ‘मद्य-मांस मुक्‍त’ करण्‍यात यावा, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथे झालेल्‍या वारकरी अधिवेशनात करण्‍यात आली.

विठ्ठला, समाजातील प्रत्येक घटकाला सुखी आणि समाधानी कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले.