थोडक्यात महत्त्वाचे (१३ एप्रिल २०२५)
तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
कोणताही विभाग भ्रष्टाचारमुक्त नसणे, हे दुर्दैवी !
तळागाळापर्यंत मुरलेली भ्रष्ट मनोवृत्ती प्रगतीपथावरील देशासाठी धोकादायक !
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे ४ लाख रुपयांची लाच मागितली.
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होईल, अशी शिक्षा दिल्याविना लाचखोरी संपुष्टात येणार नाही.
घोडबंदर भागातील भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक पर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे
गोवा राज्यातून विदेशी मद्य आणून त्याची पुनर्विक्री करणार्या दोघांना उत्पादन शुल्क विभागाने कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
धरणग्रस्त शेतकर्यांकडून १ लाख ६० सहस्र रुपयांची लाच घेतांना शिरूर प्रांत कार्यालयातील महिला वरिष्ठ कारकून सुजाता बडदे आणि खासगी व्यक्ती तानाजी मारणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
कराड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला खासगी व्यक्तीसह लाच स्वीकारतांना विभागाने रंगेहात पकडले. भीमराव शंकर माळी, असे कराड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षकाचे नाव असून मुस्तफा मोहिदिन मणियार असे त्यांच्या खासगी साहाय्यकाचे नाव आहे.