पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’च्या १३ पैकी ९ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’च्या १३ पैकी ९ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
वाराणसी महानगरपालिकेच्या बैठकीत शहरांतर्गत चालणारी मांस आणि मासे यांची दुकाने शहराच्या सीमेबाहेर हलवण्याच्या योजनेला संमती देण्यात आली. हिंदूंच्या प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या शहरामध्ये असा निर्णय घेतला गेला पाहिजे !
गेल्या २ दिवसांपासून भाविक विविध ठिकाणांहून डोंगरावर येत असून १० लाखांहून अधिक भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले.
संत तुकाराम महाराजांच्या भूमीत पाचवा वेद निर्माण झाला आहे. याच साधुसंतांच्या विचारांवर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ गेली १०० वर्षे समाजाचे संघटन आणि राष्ट्र पुनरुत्थानाचे कार्य करत आहे.
शबरीमलाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र यांमध्ये रूपांतर करण्याच्या केरळ सरकारच्या योजनेमुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून भ्रष्टाचार, मंदिरांवरील राज्याचे नियंत्रण आणि सनातन धर्माला निर्माण झालेला धोका यांविषयी भक्तगण चिंता व्यक्त करत आहेत.
‘गोवा देवभूमी आहे’, हे देश-विदेशात कळण्यासाठी सरकारने ‘तीर्थाटना’साठी विविध स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक !
रावेर येथून ५ कि.मी. अंतरावर भोकर नदीकाठावर ओंकारेश्वर हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. वनवासकाळात प्रभु श्रीरामाने येथे शिवलिंग स्थापन केले, अशी आख्यायिका आहे. या तीर्थक्षेत्रस्थळी केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत देहली येथील ‘रामायण परिपथ’चे अध्यक्ष डॉ. राम अवतार यांनी नुकतीच भेट दिली.
एस्.टी.च्या समवेत संयुक्तपणे धार्मिक स्थळांच्या भेटीचे आयोजन करावे, अशी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आस्थापनांना केले आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अल्प व्ययात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता येईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
नदीचे जल वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात, अनेक संतांचे अभंग जिच्या उल्लेखाविना पूर्ण होत नाहीत, अशा इंद्रायणी नदीमध्ये गटारांचे प्रदूषित पाणी सोडले जात आहे. इंद्रायणी नदी पुढे आळंदी आणि-देहू या तीर्थक्षेत्रात जाते, अशा या पवित्र नदीमध्ये आळंदी-देहू मार्गावरील कुदळवाडी-चिखली चौक येथे कारखान्यांतील रसायनयुक्त आणि घरांमधील सांडपाणीमिश्रीत मैला थेट सोडला जात आहे.
ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठपूर्तीच्या निमित्ताने आळंदीत कृतज्ञता सोहळा आणि गौरव ग्रंथाचे प्रकाशन आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोलतांना त्यांनी ही ग्वाही दिली.