प.पू. काणे महाराजांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त मनोहरबाग येथे कार्यक्रम पार पडला

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. आणि सौ. अवचट यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला. यानंतर भक्तांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ’ या मंत्राचा वैखरीतून नामजप करून प.पू. काणे महाराजांच्या संदर्भातील आठवणी तसेच प्रसंग सांगितले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव पुसून टाका ! – प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज

आजच्या तरुणांनी केवळ सामाजिक माध्यमांद्वारे पोस्ट टाकण्याएवढेच सिमीत न रहाता प्रत्येक मंडळ, घरांमध्येही सैनिक हुतात्मा झालेल्याचा दुखवटा व्यक्त केला पाहिजे, असे मत दत्त मंदिर तमणाक वाडा येथील प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज यांनी व्यक्त केले.

३० लाखांच्या मुद्देमालासह ५० हून अधिक घरफोड्या करणारे सराईत चोरटे जेरबंद !

शहर आणि परिसरात ५० हून अधिक घरफोड्या करणार्‍या सनिसिंग दूधानी आणि सोहेल जावेद शेख यांच्यासह एका अल्पवयीन चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनाने भाविकांना झाले भावाश्रू अनावर !

महाराष्ट्र शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे श्री स्वामी समर्थांचे मंदिरही १६ नोव्हेंबरपासून उघडण्यात आले.

(म्हणे) ‘पं. नेहरू यांनी दूरदृष्टीने राष्ट्राचा पाया रचला !’

काँग्रेसने ६० वर्षांच्या सत्ताकाळात लाखो कोटी रुपयांचे घोटाळे करून देशावरील कर्जाचा डोंगरच वाढवला.  ही राष्ट्रउभारणी आहे का ? प्रत्येक क्षेत्रात देशाला अधोगतीकडे नेणारी काँग्रेस देशाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळाच आहे, असेच जनतेला वाटते ! – संपादक

मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर छठ पूजेला यंदा बंदी – मुंबई महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्रकिनार्‍यावर छठ पूजेला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी या वर्षी घरीच छठ पूजा साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनावर महाराष्ट्रासह भारतात बंदी घाला !

प्रसिद्धीसाठी हिंदूंच्या भावना दुखावून हिंदु देवतांचा अपमान केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. या आस्थापनावर बहिष्कार टाकून खर्‍या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले.

पुष्पगुच्छ आणि हार-तुरे यांसाठी साडेपाच सहस्र रुपयांचा ठाणे महानगरपालिकेचा प्रस्ताव; भाजप नगरसेवकांचा आक्षेप

महानगरपालिकेतील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, उपक्रम यांसाठी आणि पदाधिकारी अन् अधिकारी यांना पुष्पगुच्छ, तुळशीचे रोप, हार-तुरे देण्यासाठी, तसेच फुलांची सजावट आदी साहित्यासाठी प्रतिदिन साडेपाच सहस्र रुपये व्यय करण्याचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने सिद्ध केला आहे.

बनवेगिरी करणार्‍यांनी ३ सहस्र जणांची आर्थिक हानी केली !

विजय गुरनुले आणि अविनाश महादुले या मावसभावांनी दळणवळण बंदीच्या काळात ‘मेट्रो रिजन ट्रेडिंग कंपनी’ या आस्थापनाच्या नावाखाली ३ सहस्र लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात उपचारास अनुमती

कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी यांची प्रकृती बिघडल्याने  मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना १५ दिवस उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात भरती होण्यास अनुमती दिली आहे.