सिंधुदुर्गातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, किल्ले आणि स्मारके खुली

जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटक आणि नागरिक यांच्यासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळेही खुली करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

(म्हणे) ‘जिवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षा पुरवावी !’

पणजी येथील व्ही.एम्. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी २१ एप्रिल २०२० या दिवशी ‘फेसबूक’द्वारे एक आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली होती. या प्रकरणी प्रा. सिंह यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम २९५ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली  

श्रीकृष्ण विराजमानसह ८ याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने स्वीकारून नोटीस दिली

मोसूल (इराक) येथे ‘इस्लामिक स्टेट’ने तोडफोड केलेले जुने चर्च मुसलमानांनी पुन्हा उभारले !

इराकमधील मुसलमानांकडून भारतातील धर्मांध बोध घेतील का ? काश्मीरमधील तोडफोड केलेल्या शेकडो मंदिरांची डागडुजी करून हिंदूंना परत काश्मीर खोर्‍यात बोलावतील का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.  

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील श्रीगुरु गोशाळेत बनवल्या जातात शेणापासून पणत्या !

केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !

सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १०३ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९९ आहे.

किती मुसलमान तरुणी हिंदु तरुणांशी विवाह करतात ! – रामेश्‍वर शर्मा, हंगामी  अध्यक्ष, विधानसभा, मध्यप्रदेश

पाकिस्तान आणि आय.एस्.आय.चे हस्तक ‘सीते’ला ‘रुबिया’ बनवण्याचा कट रचत आले आहेत.

प्रत्येक हॉटेलने एक खोली अलगीकरणासाठी ठेवणे बंधनकारक ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

हॉटेलमध्ये आलेला पर्यटक कोरोनाबाधित झाल्यास त्याला अलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्येक हॉटेल चालकाला हॉटेलमधील एक खोली अलगीकरण सुविधेसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असणार आहे.

कणकवलीत भटक्या कुत्र्यांवर नगरपंचायतीची उपाययोजना

कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गेले काही दिवस वाढला आहे. यासाठी नगरपंचायतीच्या वतीने कृती आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. कणकवलीतील भटके कुत्रे पकडून त्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पर्वरीवासियांचा सा.बां. खात्याच्या कार्यालयावर मोर्चा

आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक पर्वरीवासियांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पर्वरी येथील कार्यालयावर मोर्चा नेला. पर्वरी परिसरात गेले काही मास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असल्याने हा मोर्चा नेण्यात आला.