अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात सूक्ष्मातून सुचलेले विचार !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त होता, त्या वेळी मी घरी नामजप करताना मला एक वटवृक्ष दिसला आणि ‘तो हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष आहे’, असे मला वाटले. त्या वेळी देवाने सुचवलेले विचार पुढे दिले आहेत.

श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

१७.४.२०२४ या दिवशी श्रीरामनवमी आणि २३.४.२०२४ या दिवशी हनुमान जयंती आहे, त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे…

IIT Bombay disrespecting Bhagwan RamSita : ‘आयआयटी बाँबे’च्या विद्यार्थ्यांकडून नाटकाद्वारे प्रभु श्रीराम आणि सीता यांचा अवमान !

उठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करतो आणि तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! अशा संस्थांमधून तयार होणारे ‘भावी अधिकारी’ कुठल्या मानसिकतेचे असतील ? हे वेगळे सांगायला नको !

दुष्प्रवृत्तींचे निर्दालन अन् संघटित होण्याची प्रेरणा देणारा गुढीपाडवा !

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मोठा मुहूर्त आहे आणि शालिवाहन शकाचा प्रारंभ या दिवसापासून होते.

‘जय श्रीराम’ न म्हणता ‘जय सीताराम’ म्हणा ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक

काँग्रेसवाले ‘जय सीताराम’ तरी म्हणण्याचे मान्य करतात, हेही नसे थोडके !

अयोध्या येथील श्रीराममंदिराचे बांधकाम चालू असतांना घडलेल्या सूक्ष्मातील प्रक्रियेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एका साधिकेने केलेले सूक्ष्म परीक्षण

श्रीरामाच्या वानरसेनेतील काही वानरांनी त्यांचे उर्वरित प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी, तसेच ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात साहाय्य करण्यासाठी मानवदेहात जन्म घेतला आहे.

श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची कु. अपाला औंधकर हिला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

श्री रामलल्लाच्या पूजेच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये ४५ टक्के श्रीरामतत्त्व, १५ टक्के श्रीकृष्णतत्त्व आणि ४० टक्के श्रीविष्णुतत्त्व कार्यरत होते’, असे मला जाणवले.

देहलीतील ‘जे.एन्.यू’ विश्‍वविद्यालयात भगवान श्रीरामाविषयी संतापजनक घोषणा !

‘जे.एन्.यू.’त साम्यवादी विचारांचे मूठभर विद्यार्थी देश आणि हिंदु विरोधी वातावरण निर्माण करून अन्य विद्यार्थ्यांची मने कलुषित करत असल्याने या विश्‍वविद्यालयातील या विद्यार्थ्यांना बडतर्फ करणे किंवा विश्‍वविद्यालयाला टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे !

श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्‍या काँग्रेसने त्याची शिकवण अंगिकारण्याचे केले आवाहन !

इंग्रजीत एक म्हण आहे जिचा मराठीतील अर्थ आहे – ‘तुम्ही कुणाला सतत मूर्ख बनवू शकत नाही !’ काँग्रेस हिंदूंना मूर्ख समजते का ? तिला जरी तसे वाटत असले, तरी हिंदूंनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे, हे राहुल गांधी यांनी विसरू नये !