आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
‘आयुष्यभर थोडीफार नामजपादी साधना केल्यानंतर म्हातारपणी त्याची आठवण झाल्यावर ‘आयुष्यात देवासाठी काही तरी केले !’, याची जाणीव होते आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाच्या संदर्भात निश्चिंतता होऊन मनाला एक समाधान लाभते !’
‘आयुष्यभर थोडीफार नामजपादी साधना केल्यानंतर म्हातारपणी त्याची आठवण झाल्यावर ‘आयुष्यात देवासाठी काही तरी केले !’, याची जाणीव होते आणि आयुष्याच्या पुढील प्रवासाच्या संदर्भात निश्चिंतता होऊन मनाला एक समाधान लाभते !’
‘भगवंताच्या चरणी जे पूर्णपणे आत्मसमर्पण करतात, ते तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा जगाचे अधिक हित साधत असतात. पूर्णत: शुद्ध बनलेला एकच महापुरुष तथाकथित शेकडो उपदेशकांहून अधिक कार्य करत असतो.
ज्याने जीवनकला आत्मसात् केली, जीवनशक्तीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि जो जगण्यातील आनंद मिळवू शकतो, त्यानेच खरे जग जिंकले.
‘सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे.
‘आपण पहिला धडा घेतला पाहिजे की, मी कोणत्याही बाह्य गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही, दुसर्या कोणत्याही व्यक्तीला मी दोष देणार नाही. तसा निश्चय करा. माणूस व्हा, उठा आणि सर्व दोष स्वतःवर घ्या.
‘ग्रंथाध्ययनाचा आपल्यावर खरोखर काय परिणाम झाला आहे ? याचा आपण शांतपणे विचार केल्यास आढळून येईल की, त्यामुळे फार तर आपल्या बुद्धीला खाद्य मिळून ती पुष्कळ तीक्ष्ण झालेली आहे….
‘मनुष्याची सुखाविषयीची आसक्ती जावी’, यासाठी त्याच्या जीवनात देवाच्या नियोजनानुसार पुनःपुन्हा दुःख येते.
‘आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ होतो. स्वतःसाठी कशाचीही इच्छा धरू नका. इतरांसाठी सर्वकाही करा. त्यानेच तुम्ही ईश्वरामध्ये वास आणि संचार करू शकाल अन् ईश्वरामध्ये प्रतिष्ठित होऊ शकाल.’
‘परमार्थ साधण्यात आई-वडील, व्याही, जावई इत्यादीही साहाय्य करत नाहीत. मनुष्याने स्वतःच स्वतःसाठी साहाय्य शोधले पाहिजे. परमार्थाच्या प्राप्तीत समर्थ सद्गुरुच साहाय्य करण्यात सक्षम आहेत.
‘समाजामध्ये सर्वसाधारणतः एखादी व्यक्ती जोपर्यंत कामाची असते, तोपर्यंत इतर तिची चौकशी करतात किंवा तिची काळजी घेतात. त्यानंतर मग तिच्याकडे कुणी बघतही नाही….