कीर्तनाचे महत्त्व
परमेश्वरविषयक भक्ती अंतःकरणात वाढावी आणि सर्व जीवनसंसार शांतीसुखाचा व्हावा; म्हणून ईशसेवेचे जे स्मरणादि ९ प्रकार सांगितले आहेत, त्यात ‘कीर्तन’ हा एक विशेष महत्त्वाचा प्रकार आहे.
परमेश्वरविषयक भक्ती अंतःकरणात वाढावी आणि सर्व जीवनसंसार शांतीसुखाचा व्हावा; म्हणून ईशसेवेचे जे स्मरणादि ९ प्रकार सांगितले आहेत, त्यात ‘कीर्तन’ हा एक विशेष महत्त्वाचा प्रकार आहे.
‘जर तुम्ही कुणावर उपकार केला, तर तो स्मरणात ठेवू नका आणि जर तुमच्यावर कुणी उपकार केला, तर तो विसरू नका !’- महाभारत
‘येथे ‘मलीन चित्त आणि अमलीन शुद्ध चित्त’, यांतील भेद स्पष्ट केला आहे. चित्त अशुद्ध असणारा त्याग करतो आणि ‘मी त्याग केला’, असे मानतो. त्याचा ‘मी’ जागा असतो. तो ‘मी त्याग केला’, अशी धारणा करून घेतो.
भक्तीच्या पुष्कळ व्याख्या आहेत; पण भक्तीची पुढील लक्षणे नारद सांगत आहेत. ‘जेव्हा सर्व विचार, शब्द आणि कृती ईश्वरार्पण होतात अन् ईश्वराची अल्पशी विस्मृतीही पुष्कळ दुःखदायक होते, तेव्हा भक्तीचा आरंभ होतो.
भक्तीयोगी नामजपाच्या माध्यमातून अखंड साधना करू शकतो. ज्ञानयोगी वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन करू शकतो, कर्मयोगी असेल त्या परिस्थितीत अपेक्षारहित राहू शकतो, हठयोगी केवळ श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून अखंड साधनारत राहू शकतो.
शुचितेचे योगसूत्र आहे. शुचितेने शरिराची आसक्ती जाते, आरोग्यप्राप्ती होते, ऐश्वर्यवृद्धी होते, वैराग्य लाभते आणि ईश्वराभिमुखता प्राप्त होते.
सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !
ईश्वराकडून ज्ञान मिळण्याचे माध्यम पालटले असले, तरी दोन्ही माध्यमांतून ज्ञानच मिळत असल्यामुळे त्यामध्ये कोणताही कमीपणा वाटत नाही. उलट नवीन काहीतरी शिकण्याचा आनंद अधिक मिळत आहे.’
संत जरी झाला, तरी त्याने ४ माणसांसारखेच वागावे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय; कारण ‘सर्व ठिकाणी मीच आहे’, ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही.
मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षप्राप्तीची आस. ‘मोक्षप्राप्ती’ म्हणजे साध्या भाषेत ‘देवाची प्राप्ती’; कारण मोक्ष म्हणजे मुक्ती. ही मुक्ती बंधनातून असते. बंधन वासनेतून निर्माण होते. वासना ही कर्माची प्रेरकशक्ती असते. वासना आणि कर्म मिळूनच मनुष्य विषयी होतो.