सुवचने
‘आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंविना अन्य कुणावरही अतीविश्वास ठेवू नका आणि अतीसंशयही घेऊ नका.’ ‘आपल्यापेक्षा लहानांना भेटाल, तेव्हा करुणा ठेवा. आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तींना भेटाल, तेव्हा हृदयात आदर ठेवा.’
‘आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंविना अन्य कुणावरही अतीविश्वास ठेवू नका आणि अतीसंशयही घेऊ नका.’ ‘आपल्यापेक्षा लहानांना भेटाल, तेव्हा करुणा ठेवा. आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तींना भेटाल, तेव्हा हृदयात आदर ठेवा.’
‘साधनेमध्ये ‘व्यष्टी साधना’ (स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना) आणि ‘समष्टी साधना’ (समाजाच्या उद्धारासाठी करावयाची साधना) असे दोन प्रकार असतात…
मी परमात्म्याचा सनातन अंश आहे’, असे चिंतन करणारा साधक संसारात त्वरित निर्लेपभावास, निर्लेपपदास प्राप्त होतो.
समाजातील सर्वसाधारण व्यक्तीही साधक व्हावी, तिने साधनेकडे वळावे यासाठी ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या संदर्भातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदशक लिखाण.
केवळ ग्रंथ वाचण्यात आयुष्य वाया घालवू नका, तर ग्रंथातील जे शिकण्यासारखे आहे, ते तत्परतेने कृतीत आणा.
झोपल्यावर बाह्यमन कार्यरत नसते. त्या वेळी अंतर्मन पूर्णतः कार्यरत असते. त्यामुळे झोपेत स्वप्न पडणे, झोपेत असंबद्ध विचार येणे इत्यादी अंतर्मनामुळे होते
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळून समाजाला आदर्श घालून दिला; म्हणूनच त्याला ‘मर्यादा-पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.
श्रीरामासारखा दुसरा आदर्श पती नाही, पुत्र नाही, राजा नाही, मानव नाही आणि शत्रूही नाही. तसा आदर्श आजवर झाला नाही आणि पुढे व्हायचा नाही.’
सहजप्राप्त ज्ञानाला सद्गुरु अधिक क्रियाप्रवण तर करतातच, शिवाय त्याच ज्ञानावर आरूढ होऊन जेथून मूळ आंतरिक ज्ञानगंगा उगम पावते, तिकडेच साधकाचे भ्रमण व्हावे, अशी गती देतात. एक प्रकारे सद्गुरु उलटा प्रवास चालू करतात.
सत्तेकरता, मतपेटी (व्होट बँक)करता आसुसलेल्या या दुष्ट यच्चयावत् राजकारण्यांनी आमचा भूतकाळ, सनातन धर्म आणि त्याची नाळच आमच्या पिढीपासून तोडून टाकली.