कोथरूड येथे २१ मार्चला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ !

‘आपला परिसर’ आणि ‘तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ या वर्षी २१ ते २३ मार्च या कालावधीत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.

संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ भाळवणी आणि कारखेव येथे स्मारक उभारणार !

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली.

अतिक्रमण आणि प्रदूषण यांच्या विळख्यात मुठा कालवा !

मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.

धुळवडीच्या पार्श्वभूमीवर २७२ जणांवर पोलिसांची कारवाई !

पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.

पुरातन मंदिरांचे जतन हे महत्त्वाचे कार्य ! – डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य

केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांनी केले.

सद्गुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय काँग्रेसच्या युवकांची पदयात्रा पुण्यातच रोखली !

प्रदेश सरचिटणीस जैन म्हणाले, ‘‘अनुमती नाकारायची होती, तर आम्ही ३-४ दिवसांपूर्वी अनुमती मागितली, तेव्हाच नकार द्यायचा होता. आता अनुमती नाकारणे म्हणजे पोलिसांची ही हुकूमशाही आहे.

महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हा शब्द मी देतो. धर्माचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे.

सिंहगड रस्त्यावरील ‘नंबरप्लेट’ बसवणारी २ केंद्रे अचानक बंद झाल्याने वाहनधारकांना त्रास !

नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाचे दायित्व स्वीकारून प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का ?

औरंगजेबाची कबर शासनाने लवकर काढून टाकावी, अन्यथा कारसेवा करून कबर काढू !

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर काढावी. याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी म्हणजे १७ मार्च या दिवशी सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सकाळी ११ वाजता निवेदन देणार आहोत…