‘ट्विटर’ची ‘चिमणी’ मुक्त झाली !

ट्विटर खरेदी केल्यानंतर आणि तिघा अधिकार्‍यांची हकालपट्टी केल्यानंतर मस्क यांनी उगाच ट्वीट केले नाही, ‘चिमणी मुक्त झाली….चांगले दिवस येऊ देत !’ केवळ ट्विटरच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या सामाजिक माध्यमांवरील साम्यवादी कीड नष्ट होऊन राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना विचारस्वातंत्र्याचा अनुभव येणे आवश्यक आहे !

अमरावती येथील आमदार रवी राणा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !

आमदार रवी राणा यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी, तसेच त्यापूर्वी आणि नंतरही विविध ठिकाणी आपल्याविषयी खोटी, अपर्कीतीकारक, बनावट आणि चारित्र्यहनन करणारी जाहीर वक्तव्ये केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांचे त्यागपत्र

सध्या जगभरात सत्ताधारी पक्षात किंवा एखाद्या आस्थापनात भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाल्यास भारतियांना त्याचा अभिमान वाटतो; मात्र भारतीय वंशाच्या या लोकांना भारताविषयी अभिमान असेलच, असे नाही. सुएला ब्रेव्हरमन यांच्या विरोधावरून हे लक्षात घेते.

देशद्रोही आणि चिथावणीखोर मुसलमानांवर कारवाई न झाल्यास हिंदू रस्त्यावर उतरतील ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘हिंदू रक्षा महाआघाडी’

हा हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. गोव्यातील हिंदूंना धर्मांध मुसलमानांकडून दिल्या जाणार्‍या धमक्या ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ कदापी सहन करणार नाही.

स्टॅलिन यांचा हिंदीद्वेष !

केंद्र सरकारने हिंदीविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि हिंदीला विरोध असणार्‍या राज्यांमध्ये जनमत घ्यावे, तेथील स्थानिकांना व्यक्त होऊ द्यावे. हिंदीची मागणी असणार्‍यांना हिंदी भाषा शिक्षण उपलब्ध करावे. एकूणच काय हिंदी राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावण्यासाठी सर्वांचीच मानसिकता पालटणे आवश्यक आहे.

खोटी देयके सिद्ध करून महावितरणची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

‘मराठवाडा रेल कोच फॅक्टरी’साठी नवीन ३३ केव्ही लाईनच्या कामासाठी साहित्य खरेदी करण्यात आले होते. याची बनावट देयके सिद्ध करून महावितरणला देण्यात आली होती. ही देयके नंतर सरकारकडे संमतीसाठी पाठवण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने देहलीमधील फटाक्यांवरील बंदी कायम ठेवली !

खरेतर फटाक्यांमुळे प्रदूषण होण्यासह पैशांचाही चुराडा होत असल्याने केवळ देहलीपुरती ही बंदी मर्यादित न रहाता सरकारने भारतभर फटाक्यांवर बंदी घालायला हवी !

हिंदुत्व तोडो यात्रा… !

सध्या काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. या यात्रेत राहुल गांधी हे भारतविरोधी विधाने करणार्‍या पाद्रयाला भेटणे, पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या मुलीला भेटणे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे ‘ही यात्रा भारत जोडो कि तोडो आहे ?’, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

हिंदूंनो, ‘हलाल’विरोधी जनजागृती करण्यासाठी संघटित व्हा !

समाजात धार्मिक भेदभाव निर्माण करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर भारतात बंदी घालावी.

#Boycott_Adipurush राष्ट्रीय स्तरावर तिसर्‍या स्थानी !

हिंदुद्वेष्ट्या बॉलीवूडकडून हिंदूंच्या देवतांचे वारंवार विडंबन होत असल्याने हिंदू त्या विरोधात ट्विटर आदी सामाजिक माध्यमांद्वारे आवाज उठवत असतात; परंतु आता यावरच संतुष्ट राहून चालणार नाही, तर हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांच्यावर कुणी चकार शब्दही काढणार नाही, यासाठी हिंदूंनी स्वत:ची तशी पत निर्माण करणे आवश्यक आहे !