
इस्लामाबाद – इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ने (‘पीटीआय’ने) त्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. ‘इम्रान खान यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेतला जाईल’, असे ‘पीटीआय’ने म्हटले आहे. ‘पीटीआय’ने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सरकार नि:शस्त्र नागरिकांना क्रूरपणे मारण्यास सिद्ध आहे. इस्लामाबादला कत्तलखाना बनण्यापासून रोखण्यासाठी ते त्यांचे शांततापूर्ण आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहेत.
इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन हे गंडापूर निदर्शनाचे नेतृत्व करत होते. त्यांनी आंदोलकांना घरी जाण्यास सांगितले होते. अटकेच्या भीतीने दोघेही पळून गेल्याचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी २४ नोव्हेंबरपासून पाकिस्तानमध्ये निदर्शने चालू झाली होती. ३ दिवस चाललेल्या या आंदोलनात किमान ७ जणांना जीव गमवावा लागला. पाकिस्तान पोलिसांनी ५०० हून अधिक आंदोलकांना अटक केली आहे.
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !
Trump Tariff : ट्रम्प भारतासह अनेक देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादणार