काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या पक्षात किती किंमत आहे, हे माहीत आहे ! – धर्मराव बाबा आत्राम, मंत्री

वडेट्टीवार आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी १० दिवस देहली येथे बसून होते; मात्र ते उमेदवारी मिळवू शकले नाही, असे प्रतिपादन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

India Election China Threat : चीनचा भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (ए.आय.द्वारे) हस्तक्षेपाचा प्रयत्न!  

जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाला संशय

Shahnawaz Hussain : मुसलमानांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवावा ! – भाजपचे नेते शाहनवाज हुसेन

हुसेन यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याच्या चर्चेवरून ते म्हणाले की, भाजपने माझ्यावर अन्याय केला, असे मला वाटत नाही.

Corruption In Goa Elections : निवडणुकीतील आर्थिक गुन्हे रोखणार्‍या पथकातील दोघे भ्रष्टाचारामुळे निलंबित

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?

संपादकीय : निवडणुकीत आश्वासने नकोत ! 

निवडणुकीच्या काळात अवास्तव आश्वासने देणार्‍या उमेदवारांवर कठोर कारवाई करणारा कायदा बनवणे आवश्यक !

T Raja Singh : आम्हाला एकाही मुसलमानाच्या मताची आवश्यकता नाही ! – आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रसाराचे दायित्व टी. राजासिंह यांच्याकडे आहे. येथे ६० टक्के मुसलमान मतदार आहेत.

Election Freebies : शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देणार ! – अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत

जनतेला काय द्यायला हवे, तेही न कळणारे उमेदवार !

जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !

‘रश्मी बर्वे यांनी वर्ष २०२० मध्ये वडिलांच्या शैक्षणिक दस्तावेजांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र काढले होते; पण त्यासाठी त्यांनी वडिलांचे खोटे शैक्षणिक प्रमाणपत्र सादर केले आहे,’ असा त्यांच्यावर आरोप आहे.

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘अमरावती येथून ४ एप्रिल या दिवशी नवनीत राणा यांचे आवेदन प्रविष्ट करणार आहे. नितीन गडकरी यांच्यानंतर नवनीत राणा यांना सर्वाधिक मते मिळतील’, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !

आपल्या पक्षाचे उमेदवार घोषित होण्यापूर्वीच गायकवाड यांनी आवेदन प्रविष्ट केल्याने त्यांनी बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे.