झारखंडमधील काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे मंत्री हाफिजुल हसन अन्सारी यांचे डॉ. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात विधान

रांची (झारखंड) – प्रथम आपण शरीयतला धरून राहू, नंतर राज्यघटनेला. इस्लाममध्ये शरीयत महत्त्वाचा आहे. आपण कुराण आपल्या हृदयात आणि राज्यघटना हातात ठेवतो, असे विधान काँग्रेसचे आमदार आणि झारखंडचे क्रीडा, युवा व्यवहार अन् अल्पसंख्याक कल्याण मंत्री हाफिजुल हसन अन्सारी यांनी केले. ते १४ एप्रिलला डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते.
झारखंड राज्य भाजपने अन्सारी यांच्या विधानावर म्हटले आहे की, ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांची दारे उघडी आहेत. भारत केवळ डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या राज्यघटनेवर चालेल आणि ती सर्वोच्च राहील.

संपादकीय भूमिका
|