
नवी देहली – जर वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत संमत झाले, तर पर्सनल लॉ बोर्ड न्यायालयात जाईल आणि विधेयकाला आव्हान देईल. आमची बाजू घटनात्मक तथ्यावर आधारित असल्याने आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी लोकसभेत हे विधेयक संमत झाल्यावर व्यक्त केली.
मौलाना महाली पुढे म्हणाले की, मुसलमानांना आशा होती की, नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल (संयुक्त) आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलुगु देसम पक्ष या विधेयकाला विरोध करतील; परंतु तसे झाले नाही. जर सर्व पक्षांनी या विधेयकाला जोरदार आणि ठोस तथ्यांसह विरोध केला असता, तर बरे झाले असते.
संपादकीय भूमिकाप्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे; मात्र न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला, तर मुसलमान तो स्वीकारणार आहेत का ? श्रीरामजन्मभूमीचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यानंतर ते अद्यापही मनापासून तो स्वीकारत नाहीत, असेच वेळोवेळी दिसून येते ! |
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !