संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेने सल्ला देऊ नये ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, हे एकमताने मान्य केलेले आहे.

१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !

येत्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल ! – महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभाग

राज्यातील १४ सहस्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर, संभाजीनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे.

भिवंडीतील काँग्रेसच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सर्व नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना नोटीस दिली

संधीसाधू काँग्रेस !

एवीतेवी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी काँग्रेस स्वतःचा स्वार्थ साधतांना नेहमीच लोकशाहीचा गळा घोटते, हाही इतिहास आहे. कृषी कायद्याचेच पहायचे झाले, तर हा कायदा लोकशाही मार्गाने सार्वभौम संसदेने संमत केला. तरीही काँग्रेस यास विरोध करून एक प्रकारे लोकशाहीचा अवमानच करत नाही का ?

उत्तरप्रदेश सरकार राज्यात १२० नव्या गोशाळा उभारणार

सरकारने केवळ नव्या गोशाळा उभारू नयेत, तर राज्यात आतापर्यंत अस्तित्वात असणार्‍या गोशाळांची स्थिती अधिक कशी चांगली होईल आणि तेथील गायी सुरक्षित कशा रहातील, याकडेही लक्ष दिले पाहिजे !

उत्तम अन्वेषणापेक्षा राजकीय वापर होण्याच्या कारणाने वारंवार चर्चेत आलेली केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या संदर्भातील काही तथ्ये !

‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणेेच्या (सीबीआयच्या) कार्यक्षेत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच निवाडा आला. नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने सीबीआयचे कार्यक्षेत्र निश्‍चित केले आहे.

जिल्हा पंचायतीचा पराभव एक आव्हान म्हणून स्वीकारणार ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

जिल्हा पंचायतीत पक्षाचा झालेला पराभव आम्ही एक आव्हान मिळून स्वीकारत आहोत. गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न हाताळून आम्ही यापुढे गोमंतकियांना एक चांगले नेतृत्व देणार आहोत.

शेतकर्‍यांना हमीभाव देण्याची व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार नाहीत !

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘कृषी कायद्यांमध्ये सुधारणांवरून विरोधकांना त्रास होत नाही, तर ‘हे मोदी यांनी का केले ?’ यावरून त्रास होत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.

गैरप्रकारांना अनुसरून ‘बी.एल्.ओ.’मध्ये पालट करण्याचा मुख्य निवडणूक अधिकार्‍यांचा आदेश

गैरप्रकार झाल्यावरून ‘बूथ लेव्हल ऑफिसर’मध्ये (बी.एल्.ओ.) पालट करण्याचा आदेश मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना दिला आहे.