१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – आम्ही येथे अनेक दिवसांपासून आंदोलनाला बसून दमलो आहोत. १ जानेवारी २०२१ नंतर आम्ही मृतदेहांचा डोंगर उभा करू.

आम्ही आमचे रक्त देऊ. आम्ही त्यासाठी कुठेही आणि कोत्याही थराला जाऊ, असे विधान पंजाबच्या लुधियाना येथील काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू यांनी येथे शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये केले.