गिरगाव चौपाटी परिसरातील वडाचे झाड तोडणार्‍यांवर कठोर कारवाई करावी ! – पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी 

गिरगाव चौपाटी भागातील तांबे चौकातील सिग्नलला लागून असलेले वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या पहाटे कापण्यास आरंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत हे झाड पूर्णपणे कापण्यात आले. याविषयी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या रुग्णावर उपचाराचे निर्बंध शिथिल करण्यासाठी खासगी रुग्णालयांची याचिका

कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने काही जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांवरील खाटा राखीव ठेवण्यासह उपचाराच्या दरांचे बंधन शिथिल करण्याची मागणी रुग्णालयांनी केली आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही खासगी रुग्णालये यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

एम्.आय.एम्.चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची चौकशी करण्याचा आदेश

एखादी परदेशातील व्यक्ती मालेगाव शहरात येते आणि त्याची मालेगाव पोलिसांना माहिती नाही, यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चौकशीची मागणी.

राज्यशासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

म्यानमारमध्ये सैन्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

म्यानमारमधील सद्यःस्थितीवर हाच निर्णय योग्य असून त्यामुळेच देशाचे भवितव्य सुरक्षित हाती रहाणार आहे’ – म्यानमारचे सैन्यदलप्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग

आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानाकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून भारताची प्रतिमा मलीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. यासाठी सरकारने स्वतःची बाजू जोरकसपणे मांडून आंदोलनात घुसलेल्या समाजविघातक घटकांची माहिती समोर आणणे आवश्यक !

(म्हणे) ‘शांततेसाठी सर्व दिशांना हात पुढे करण्याची ही वेळ आहे !’ – पाकच्या सैन्यदलप्रमुखांचे भारताला आवाहन

शांतता निर्माण करण्यासाठी प्रथम पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावे आणि जिहादी आतंकवादी कारवाया बंद कराव्यात !

शेतकर्‍यांच्या सूत्रांवरून राज्यसभेत गोंधळ घालणारे आपचे ३ खासदार दिवसभरासाठी निलंबित

गोंधळ घालणार्‍या अशा खासदारांचे सदस्यत्वच रहित करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची आवश्यकता आहे !

संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा विचार नाही ! – केंद्र सरकार

केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार, याचे उत्तर कोण देणार ?

शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा नोंद

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.