शांतता निर्माण करण्यासाठी प्रथम पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावे आणि जिहादी आतंकवादी कारवाया बंद कराव्यात !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जम्मू-काश्मीर हे भारत-पाकिस्तान यांच्यामधील पूर्वीपासून चालत आलेले सूत्र आहे. यावर दोन्ही देशांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या इच्छा-आकांक्षा लक्षात घेऊन शांततामय मार्गाने तोडगा काढावा, असे विधान पाकचे सैन्यदलप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी येथे केले. खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील रिसालपूर येथील पाकिस्तानी वायुदलाच्या पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
(सौजन्य : India Today)
‘परस्परांचा आदर राखणे आणि शांततेने एकत्र रहाणे, यांसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. (पाकचा विनोद ! – संपादक) शांततेसाठी सर्व दिशांना हात पुढे करण्याची ही वेळ आहे’, असेही बाजवा म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पाक तिसर्या पक्षाच्या हस्तक्षेपासाठी प्रयत्नशील होते; मात्र आता भारत-पाक यांनी शांततामय मार्गाने तोडगा काढावा, असे म्हणणे महत्त्वपूर्ण ठरते.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !