
मुंबई – कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने काही जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांवरील खाटा राखीव ठेवण्यासह उपचाराच्या दरांचे बंधन शिथिल करण्याची मागणी रुग्णालयांनी केली आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही खासगी रुग्णालये यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.
याचिकेत म्हटले आहे की, कोरोनाची साथ आटोक्यात येत असतांनाही सरकारने उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना ८० टक्के खाटा राखीव ठेवणे आणि निश्चित केलेल्या दरांनी उपचार देण्याचे बंधन २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम ठेवले आहे. यामुळे खासगी रुग्णालयांची हानी होत आहे.
सरकारची बाजू मांडतांना राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईसह सात जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयांत पुरेशा खाटा उपलब्ध असल्या, तरी आयसीयू आणि व्हेंटिलेटरसह आयसीयू पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे तेथे किमान ५० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे बंधन ठेवावे लागेल. उर्वरित जिल्ह्यांत अधिसूचनेची कार्यवाही केली जाणार नाही; मात्र भविष्याची तरतूद विचारात घेता अधिसूचना रहित केली जाणार नाही, अशी भूमिका सरकारच्या वतीने मांडण्यात आली. याविषयी पुन्हा सुनावणी होणार आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.