पालघर येथे शाळेत जीन्स घालून येणार्‍या ५ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस !

विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनाही धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता ! राज्यातील सर्वच शाळांमध्ये शासनाने कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाश्‍चात्त्य पद्धतीचे कपडे न घालणे बंधनकारक करावे !

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांचा शिवसेनेत, तर गटनेते मंदार हळबे यांचा भाजपमध्ये प्रवेश

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर १ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, तर २ फेब्रुवारी या दिवशी मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

मालाड (मुंबई) येथील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत संपूर्ण सेट भस्मसात

येथील मालाड भागातील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळी २ फेब्रुवारी या दिवशी दुपारी आग लागली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणार्‍या या चित्रपटाच्या ‘क्रोमा शूट’साठी मुंबईत सेट उभारण्यात आला होता. अभिनेता सूर्या एका दृश्याचे चित्रीकरण करत होता. तेवढ्यात सेटला आग लागली.

पोलिओ लसीकरणाच्या वेळी बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा

पोलिओ लसीकरणाच्या वेळी १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याची घटना ताजी असतांना पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका बाळाच्या पोटात लसीकरणाच्या वेळी प्लास्टिकचा तुकडा उडून गेला आहे.

दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

(म्हणे) ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे !’

एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याची हिंदुद्वेषी गरळओक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?

‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! –  प्रकाश जावडेकर

वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि राष्ट्रविरोधी असणार्‍या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !

(म्हणे) ‘अण्णा हजारे हे अविश्‍वासू !’- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर

अण्णा हजारे यांनी काय करावे आणि ते कसे आहेत, हे देशाची सर्वाधिक हानी करून देशाला रसातळाला नेणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. अण्णा हजारे यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का ?

(म्हणे) ‘किसान मोर्चाच्या लोकांवर खोटे गुन्हे नोंद केले !’ – मेधा पाटकर यांचा आरोप

देहलीच्या रस्त्यावर बॅरिकेट तोडणे, ट्रॅक्टर गोल फिरवणे, दगडफेक आदी केलेले समाजविघातक प्रकार हे गुन्हे नोंद करण्यालायक नाहीत का ? संयुक्त किसान मोर्चात अन्य लोक सहभागी होते, तर त्यांना सहभागी न होऊ देणे हे मोर्चाचे दायित्व नव्हते का ?

गंगापूर येथे भव्य मिरवणुकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची स्थापना

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या अश्‍वारूढ पुतळ्याची ३० जानेवारी या दिवशी भव्य मिरवणुकीद्वारे स्थापना करण्यात आली