कात्रज (जिल्हा पुणे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘गडकिल्ले संवर्धन सेल’चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी ‘स्वतंत्र महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे, तसेच या मागणीचे पत्रही उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) गेल्या ५ वर्षांत सातत्याने ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असल्याने गड-दुर्गांचे तट, बुरूज, सीमाभिंत, पायवाटा, वाहन वाटा, पायर्यांकडेच्या दरडी कोसळून दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढत आहे. गड-दुर्गांचा भक्कमपणा कायम रहाण्यासाठी प्रमुख गडांच्या सर्वेक्षणाचे काम आणि उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर गड-दुर्गांना पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी महामंडळ स्थापन होण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > गड-दुर्ग संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी !
गड-दुर्ग संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी !
नूतन लेख
- वडीलधार्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ ! – मुख्यमंत्री
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक
- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करून अवैध चाकरभरतीचा आरोप !
- पुणे येथील वाडिया महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार !
- दिवाळी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीचा दिनांक घोषित करू !- राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त
- थोडक्यात महत्त्वाचे : रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्यांची हानी; वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !