जागतिक आरोग्य संघटनेच्या मानचित्रात (नकाशात) जम्मू-काश्मीर आणि  लडाख भारतापासून वेगळे !

लंडनधील भारतीय असलेल्या पंकज यांच्या निदर्शनास ही गोष्ट सर्वप्रथम आली. ‘यामागे चीनचा हात असू शकेल; कारण चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य केले जाते’, असा दावा पंकज यांनी केला आहे.

औषधी उपयोगासाठी गांजाची झाडे गोव्यात लावण्यासंबंधीच्या विधेयकावर गोवा शासन विचार करणार

गोवा राज्यात औषधी उपयोगासाठी गांजाची झाडे लावण्यासंबंधी विधेयकाला अनुमती देण्यासंबंधी गोवा शासन विचार करत आहे. प्रस्तावाचा कायदा खाते अभ्यास करत आहे.

पर्यावरण आणि निसर्ग संपदा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत ! – सुभाष पुराणिक, वन्यजीव अधिकारी

सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे, तसेच आहे ती निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सिंधुदुर्गचे माजी साहाय्यक वनसंरक्षक आणि पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केले.

आतंकवादी झकीऊर रेहमान लखवी याला प्रतीमहा दीड लाख रुपये खर्चासाठी देण्यास संयुक्त राष्ट्रांची पाकला अनुमती

संयुक्त राष्ट्रांनी एकीकडे आतंकवाद निपटण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसर्‍या बाजूने अशा प्रकारे आतंकवाद्यांना सहानुभूती दाखवायची, हे संतापजनक होय.

अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कॅनाबिसच्या लागवडीमध्ये गोव्यात वाढ

चरस, गांजा आदी अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे ‘कॅनाबिस’ ! या रोपांची लागवड आता गोव्यात केली जात आहे. अशा प्रकारची मागील एका वर्षात ८ प्रकरणेे उघडकीस आली, तर नोव्हेंबर २०२० या एका मासातच ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

(म्हणे) ‘आंदोलनामध्ये बळाचा वापर करून ती दडपणे चुकीचे !’

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन सरकारने कुठेही दडपलेले नाही, उलट त्यांच्याशी आतापर्यंत ५ फेर्‍यांची चर्चा झालेली आहे. तरीही भारताची अपकीर्ती करण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने संयुक्त राष्ट्रे आणि अन्य पाश्‍चात्त्य देश जाणीवपूर्वक करत आहेत, त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे !

‘कोरोनाचे संकट संपेल’, असे स्वप्न जगाने पहाण्यास अडचण नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी लसींवर काम चालू आहे. काही ठिकाणी लस तिसर्‍या टप्प्यातही आहे. त्यांचे परिणाम पाहिले, तर आता आपण कोरोनाचे संकट संपेल, असे स्वप्न पहाण्यास अडचण नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेंड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे.

संयुक्त राष्ट्रांकडून हिंदु, शीख आणि बौद्ध धर्मियांवरील आक्रमणांकडे दुर्लक्ष ! – भारताची टीका

हिंदु, शीख आणि बौद्ध यांच्यावर पाक, अफगाणिस्तान येथे अनेक दशकांपासून अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्र त्यावर आंधळी, बहिरी आणि मुकी असल्यासारखीच आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाचा जगाच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने काहीही लाभ नाही. अशी संघटना विसर्जित करणेच योग्य ठरेल !

इस्लामी देशांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा नाहीच !

पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

पाक संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो ! – भारताची पाकवर टीका

पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे.