वन विभाग आणि कॉर्पोरेट ‘सी.एस्.आर्.’च्या संयुक्त प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी संमत
तिवडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती. ग्रामस्थांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी कठीण डोंगर उतरून आजूबाजूच्या गावांत भटकंती करावी लागत असे.
तिवडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती. ग्रामस्थांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी कठीण डोंगर उतरून आजूबाजूच्या गावांत भटकंती करावी लागत असे.
सततच्या पावसामुळे केरळम्च्या वायनाडमध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन काही गावे गाडली गेली आहेत ! आतापर्यंत १५० माणसे मृत्यूमुखी आणि ३०० बेपत्ता आहेत.
पुष्कळ मोठे प्रलयंकारी वादळ नसतांनासुद्धा केवळ ४ दिवसांच्या पावसात विशेषतः मुंबईमध्ये शेकडो झाडे सहजगत्या कोसळली. मुंबई पाठोपाठ विविध शहरांमध्ये हीच शोकांतिका चालू झाली आहे.
रस्ते आणि पदपथ यांच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झाडांच्या मुळाशी करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळेच झाडांची ‘मूक हत्या’ होत असून प्रशासनाच्या दाव्यानंतरही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही.
‘सुराज्य अभियाना’ने केलेल्या मागण्यांवर तातडीने ठोस कारवाई न झाल्यास व्यापक जनआंदोलन उभारून उत्तरदायी शासकीय यंत्रणांविरुद्ध कायदेशीर लढा अधिक तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी सुराज्य अभियानाने दिली.
राज्यातील निसर्गसंपत्ती आणि वनसंपत्ती यांचा विनाश करणार्या आगीच्या घटनांवरून विधान परिषदेत सत्ताधारी अन् विरोधी पक्षांच्या आमदारांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागांतील पाणी संवर्धन होऊन भूजल पातळी वाढण्यास साहाय्य होईल, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, तसेच हा प्रकल्प शेतीसाठी लागणार्या पाण्याच्या उपलब्धतेसाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
आंबोली आणि दोडामार्ग येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाची कारवाई
केरळम्च्या बाल कल्याण समितीने प्रारंभ केलेल्या या अभियानाचा उद्देश विद्यार्थिनींना सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरल्या जाणार्या रासायनिक घटकांपासून वाचवणे आणि मुलींमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. या मोहिमेचा उद्देश मुलींना त्वचारोगांच्या धोक्यापासून वाचवणे हा आहे.
तालुक्यातील विदारक स्थिती पालटण्यासाठी रोजगार निर्मिती करणार्या पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करण्यात यावी, असा ठराव सदस्य राजेश गुरव यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने संमती दिली.