
जयपूर (राजस्थान) – येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने ४ जिहादी आतंकवाद्यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरवर आझमी, सैफुरहमान, महंमद सैफ आणि शाहबाज अहमद अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे शिक्षा सुनावल्यानंतरही सर्व दोषी आतंकवादी हसत हसत न्यायालयातून बाहेर पडले. त्याच्या चेहर्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. (जिहादी आतंकवादी त्यांच्या धर्मासाठी हिंदूंच्या विरोधात जिहाद म्हणून जाणीवपूर्वक आणि परिणाम ठाऊक असतांनाही आतंकवादी कारवाया करतात. त्यामुळे असा आतंकवाद केवळ फाशी देऊन थांबणार नाही, तर त्यासाठी जिहाद शिकवणार्यांवरही आणि त्या संदर्भातील साहित्यावरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)
🚨 Rajasthan: 4 terrorists — Saifurrahman, Mohammad Saif, Mohammad Sarwar Azmi & Shahbaz Ahmed — sentenced to life for planting live bombs in the 2008 Jaipur blasts that had claimed 72 lives.
📜⚖️Yet 3 of them were acquitted in the actual serial blast case by the High Court.… pic.twitter.com/8B4A2PJzWv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 8, 2025
काय आहे प्रकरण ?१३ मे २००८ या दिवशी जयपूरमध्ये झालेल्या ८ साखळी बाँबस्फोट झाले होते. यात ७१ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनुमाने २०० जण घायाळ झाले होते. याच वेळी ९ वा जिवंत बाँब चांदपोल बाजारातील गेस्ट हाऊसजवळ सापडला. तो निकामी करण्यात आला. या प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच प्रकरणात वरील आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली. |
बाँबस्फोटांच्या प्रकरणांमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने आतंकवाद्यांना ठरवले होते निर्दाेष !या बाँबस्फोटांच्या प्रकरणांमध्ये विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती; परंतु राजस्थान उच्च न्यायालयाने २९ मार्च २०२३ या दिवशी सर्व आरोपींना निर्दोष सोडले. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, पोलिसांचे आतंकवादविरोधी पथक कोणतेही पुरावे सादर करू शकले नाही आणि स्फोटात कट रचल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताही आधार सिद्ध करू शकले नाही. अन्वेषणात अनेक त्रुटी निदर्शनास आल्यानंतर त्या दूर करून पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात आले होते. यात जिवंत बाँबच्या प्रकरणात या आरोपींना आता शिक्षा झाली. सध्या बाँबस्फोटांतून निर्दाेष मुक्त करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. (ज्या जिहादी आतंकवाद्यांना जिवंत बाँब ठेवल्याच्या प्रकरणी शिक्षा होते आणि त्यांनाच बाँबस्फोट घडवल्याच्या प्रकरणात निर्दाेष ठरवले जाते, हे अनाकलनीय आहे. यात पोलिसांचे अन्वेषण चुकले कि अन्य काही ?, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे ! – संपादक) |