भाविकांना आध्‍यात्मिक लाभ प्राप्‍त करून देणारी मंदिर व्‍यवस्‍था निर्माण व्‍हावी ! – परिसंवादामध्‍ये सहभागी झालेल्‍या विश्‍वस्‍तांचा मनोदय

मंदिरांच्‍या माध्‍यमातून देवहित, भक्‍तहित आणि धर्महित साधल्‍यास चांगले व्‍यवस्‍थापन साध्‍य होणे शक्‍य !

देवभक्‍तांनो, धर्मनिरपेक्ष सरकारच्‍या नियंत्रणातून धर्ममय मंदिरांना मुक्‍त करणे, हे धर्मसंस्‍थापनेचे कार्य आहे, हे लक्षात घ्‍या !

मंदिरांमध्‍ये सरकारी प्रतिनिधी आले की, प्रथा-परंपरांवर प्रतिबंध येतात, देवनिधीमध्‍ये भ्रष्‍टाचार होतो, अन्‍य पंथीय कर्मचारी ठेवले जातात. हे दुष्‍टचक्र थांबवायचे असेल, तर देवभक्‍त हिंदूंनी मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्‍त करण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.

‘यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ देणार नाही’, अशी शपथ घेऊया !

मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देण्‍यासाठी हिंदूंनी प्रभावी संघटन करून स्‍वतःचा दबदबा निर्माण करावा ! मंदिरे वाचवण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशांचा अभ्‍यास करा ! – रमेश शिंदे

मंदिरांना ऊर्जितावस्‍था हवी !

‘हिंदु हित की बात करेगा, वहीं देश में राज करेगा’च्या ऐवजी ‘जो हिंदु हित का काम करेगा वहीं देश में राज करेगा’, असा नारा देण्‍यात येऊ लागला आहे. त्‍या हिंदुहिताच्‍या कामामध्‍ये मंदिरांच्‍या संदर्भातील कामे पहिल्‍या क्रमांकावर असणे आवश्‍यक झाले आहे. असे झाले तर भारत जगाचा विश्‍वगुरु होण्‍यास वेळ लागणार नाही !

जळगाव येथे हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्‍थान, पद्मालय यांच्‍या वतीने ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी पार पडलेली महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद

‘मंदिरांच्‍या शासकीय अडचणी आणि उपाय’ या विषयावर परिसंवाद

‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना !  

हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे.

‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे ‘फेसबुक’ आणि ‘यु ट्यूब’द्वारे थेट प्रक्षेपण !

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे ‘फेसबुक पेज’, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ वाहिनीद्वारे करण्यात आले. याचा ४ सहस्र ५००, तसेच ४ सहस्र जणांनी लाभ घेतला.

मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू केलीच पाहिजे ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

‘‘मंदिरांतील सात्त्विकता ग्रहण करण्‍यासाठी आचरण, वेशभूषा आणि देवतेविषयी भाव आवश्‍यक आहे. देवतेच्‍या तत्त्वाशी जुळवून घ्‍यायचे असेल, तर सत्त्वगुण आवश्‍यक आहे. तो वाढवण्‍यासाठी साधना करायला हवी. तमिळनाडू उच्‍च न्‍यायालयाने मंदिर प्रवेशासाठी वस्‍त्रसंहिता आवश्‍यक असल्‍याचे मान्‍य केले

प्रत्येक मंदिर सरकारमुक्त होण्यासाठी लढा देऊ ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे कोणतेही मंदिर नाही; मात्र प्रत्येक मंदिर हे हिंदु जनजागृती समितीसाठी धर्माचे केंद्र आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेले प्रत्येक मंदिर सरकारमुक्त होण्यासाठी लढा देऊ.-श्री. सुनील घनवट

मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, तर मंदिरांसाठी ‘हिंदु बोर्ड’ का नाही ? – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वाेच्च न्यायालय

मंदिरांचे संरक्षण आणि व्यवस्थापन यांसाठी सरकार मंदिरांचे अधिग्रहण न करता ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करून त्यांच्याकडे मंदिरे का सोपवत नाही ? या बोर्डमध्ये हिंदु धर्माशी संबंधित अधिकारी व्यक्तींना स्थान देऊन त्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’चा दर्जा द्यावा.