राज्यघटना धर्मविरोधी आहे का ?

हिंदु धर्मावर टीका करणे, म्हणजे त्यांना पुरोगामित्व वाटते. पुरोगामी मंडळी राज्यघटनेचा सोयीनुसार उपयोग करून हिंदु धर्माला विरोध करत असतील, तर हिंदूंनीही विश्वकल्याण साधेल, असे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

(म्हणे) ‘गुजराती आणि राजस्थानी यांना काढल्यास मुंबई ‘आर्थिक राजधानी’ रहाणार नाही !’

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते; मात्र गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला ‘आर्थिक राजधानी’ म्हटले जाणार नाही’, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

मंत्रालयात कामासाठी येणार्‍या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लवकरच १०० दिवसांचा कार्यक्रम सिद्ध करण्यात येणार आहे. पूर्वी चालू असलेली लोकहिताची कामेही चालू ठेवण्यात येणार आहेत. प्रशासनावरील ताण न्यून व्हावा, यासाठी रिक्त पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना राज्यशासन ५० सहस्र रुपये प्रोत्साहन निधी देणार !

राज्यातील १३ लाख ८५ सहस्र शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी ५ सहस्र ७२२ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

पोलिसांना घराची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘मुंबई महानगर आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा सर्वच भागांतील पोलिसांना पुरेशा संख्येने घरे उपलब्ध होतील, यासाठी तात्काळ अन् दीर्घ टप्प्याचे नियोजन करा. पोलिसांना घरांची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा’, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगपती रतन टाटा यांची भेट !

रतन टाटा यांनी मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याविषयी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी असणारे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला.

कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवावर घातलेले निर्बंध राज्यशासनाने हटवले !

कोरोना महामारीच्या काळातील निर्बंधांमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या; पण आता सण साजरे करण्यावरील निर्बंध मागे हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वच सण धूमधडाक्यात साजरे होतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभेच्या अध्यक्षांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगत १२ खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘शिवसेनेच्या १९ पैकी १८ खासदारांचा मला पाठिंबा आहे’, असा दावा करत लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे …

१२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहलीत पत्रकार परिषद !

शिवसेच्या १२ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापण्यात येणार असून त्यांनी त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. स्व. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही भाजप-शिवसेना या नैसर्गिक युतीचे सरकार स्थापन केले.