कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी मंत्रालयात बैठक घेणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा

खातेवाटप घोषित, मुख्यमंत्र्यांकडे १४, तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खात्यांचे दायित्व !

महाराष्ट्रातील राज्यशासनाचे खातेवाटप १४ ऑगस्ट या दिवशी घोषित करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ८ खात्यांचे दायित्व असणार आहे.

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (वय ५२ वर्षे) यांच्या गाडीला १४ ऑगस्ट या दिवशी पहाटे ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले.

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी महामंडळांची अथवा स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाली पाहिजे !

गड-दुर्गांवर अनुचित प्रकार, विद्रुपीकरण होणे, वणवे लावले जाणे असे प्रकार घडत आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात आली आहे.

बंडखोरी करून येतो, त्याला सर्वांत आधी मंत्रीपद मिळते ! – अपक्ष आमदार बच्चू कडू

मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी १० ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील २ मासांत राज्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. हे आर्थिक साहाय्य ३ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार : १८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये आणखी १८ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. ९ ऑगस्ट या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन सरकारमधील १८ आमदारांना मंत्रीपद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.

आज होणार मंत्रीमंडळाचा विस्तार !

महाराष्ट्राच्या रखडलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्र्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ देणार आहेत.

मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा जनतेशी संबंध !

मंत्रीमंडळाचा विस्तार होत राहील आणि सत्ताधारीही पालटत रहातील; परंतु ज्या वेळी सत्ताधार्‍यांना ‘आम्ही जनतेशी बांधील आहोत’, याची जाणिव होईल, तेव्हा खर्‍या अर्थाने लोकशाही ‘सुजलाम् सुफलाम्’ असेल !

भंडारा येथे महिलेवर सामूहिक बलात्कार: दोघांना अटक

‘यापुढे असे कृत्य कुणी करू धजावणार नाही’, असे कठोर शासन आरोपींना करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिसांना आदेश