कथित मोगल वंशजाची मागणी

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात शेवटचा मोगल बादशहा बहादूर शाह जफर याचा वंशज असल्याचा दावा करणारे याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी मागणी केली की, औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा सुनिश्चित करावी. कबरीला कायदेशीर संरक्षण मिळावे. (लाखो हिंदूंची हत्या करून सहस्रो मंदिरे नष्ट करणार्या औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणाची मागणी करणार्यांना सरकारने शिक्षाच करायला हवी ! – संपादक) ‘संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनीही या प्रकरणाची नोंद घ्यावी’, असेही ते म्हणाले.
🕌 “Ensure Aurangzeb’s tomb is protected,”
demands Yakub Habeebuddin Tucy — self-proclaimed Mughal descendant — in a letter to UN Secretary-General António Guterres.Many Hindus believe: Removing the tomb altogether would silence those demanding its protection.
PC: @IndiaToday pic.twitter.com/fP3G2B6WwI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 17, 2025
याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी पत्रात म्हटले आहे की,…
१. ही कबर ‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली आहे आणि प्राचीन स्मारके अन् पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९५८ अंतर्गत संरक्षित आहे. या कायद्यातील प्रावधानानुसार संरक्षित स्मारकाजवळ कोणतेही अनधिकृत बांधकाम, फेरफार, तोडफोड किंवा उत्खनन करता येणार नाही. अशी कोणतीही कृती कायद्यानुसार अनधिकृत आणि दंडनीय मानली जाईल.

२. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार औरंगजेबाच्या कबरीला संपूर्ण कायदेशीर संरक्षण आणि सुरक्षा देण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ए.एस्.आय) यांना निर्देश द्यावेत.
३. भारताने जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संरक्षणावरील युनेस्कोच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. वर्ष १९७२ आणि अशा स्मारकांचा नाश किंवा दुर्लक्ष हे आंतरराष्ट्रीय दायित्वांचे उल्लंघन असेल.
४. चित्रपट, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांतून ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडून जनभावना भडकावल्या जात आहेत. (औरंगजेब किती क्रूर होता, याचे संदर्भ इतिहासात जागोजागी सापडतात. तुसी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत ! – संपादक) परिणामी विनाकारण निषेध, द्वेषपूर्ण मोहिमा आणि पुतळे जाळण्यासारख्या प्रतिकात्मक आक्रमकतेला सामोरे जावे लागत आहे. (नागपूरसह काही गावांत रस्त्यांवर उतरून द्वेषपूर्ण मोहिमा आणि दंगली भडकवण्याचे काम धर्मांध मुसलमानच करत आहेत, याचा उल्लेख तुसी यांनी पत्रात का केला नाही ? – संपादक)
५. भावी पिढ्यांना शिकता यावे, यासाठी सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आवश्यक आहे, यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची कार्यवाही व्हावी. (औरंगजेबाचा क्रूर इतिहास शिकवून हिंदूंना नष्ट करण्याचे शिक्षण भावी पिढ्यांना देण्याचे षड्यंत्रच तुसी यांनी रचल्याचे उघड होते ! – संपादक)
संपादकीय भूमिकाऔरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करण्याऐवजी ती तात्काळ हटवल्यास अशी मागणी करणार्यांचे तोंड आपोआप बंद होईल, असेच हिंदूंना वाटते ! |