बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करण्याची कुडाळ सकल हिंदु समाजाची मागणी 

कुडाळ – बंगाल राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर अन् अस्थिर झाली आहे. या राज्यामध्ये हिंदु समाजावर सातत्याने होणारी आक्रमणे,  जाळपोळ, धार्मिक द्वेषभावना वाढवणारे प्रकार आणि शासनयंत्रणेचे अपयश हे अत्यंत चिंतेचे कारण बनले आहेत. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात होणारे आंदोलन हे आता हिंसक बनत आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदु समाजावर होणारे अत्याचार हे केवळ सामाजिक नाहीत, तर मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत. त्यामुळे बंगाल येथे तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करावे, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण पुरवावे, अशा मागणीचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना द्यायचे निवेदन तहसीलदार वीरसिंग वसावे यांना देण्यात आले.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या 

१. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हे प्रकार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. यामुळे सामान्य हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या अस्तित्वाचा आणि मालमत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

२. या दंगलीत सहभागी असणारे, प्रशिक्षण देणारे, आश्रय देणारे, चिथावणी देणारे, मौलवी, चिश्ती, धार्मिक नेते तथा मुसलमान संघटना यांच्यावर संघटित गुन्हेगारी कृत्य, तसेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यु.ए.पी.ए.) गुन्हे नोंदवण्यात यावेत.

३. हिंदूंच्या येथील हत्यांची सर्व प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात यावीत आणि बंगालमधील हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी जलद गती न्यायालये स्थापन करून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात द्यावी.