‘संभाजी ब्रिगेड’ने नावात पालट न केल्यास संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी ! – दीपक काटे, शिवधर्म फाऊंडेशन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख नेहमी आदरार्थीच असला पाहिजे. असे असतांना ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या नावात हा उल्लेख एकरी आहे.

‘संभाजी ब्रिगेड’ने नावात पालट करावा अन्यथा राज्यभर आंदोलन करू !

दीपक काटे म्हणाले की, ‘संभाजी ब्रिगेड’ छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी अनेकदा पत्रव्यवहार करून, भेटी घेऊन पाठपुरावा केला आहे; मात्र संघटनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

१ मेपर्यंत वाघ्या कुत्र्याचे शिल्प न हटवल्यास आम्ही हटवू ! – संभाजी ब्रिगेडची चेतावणी

राज्य सरकारने १ मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्वतः पुढाकार घेऊन हे शिल्प हटवण्याची कारवाई करील, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा ! – छत्रपती युवराज संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची (कुत्र्याची) समाधी ३१ मेपूर्वी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

संपादकीय : महापुरुषांचा सन्मान हवा !

महाराष्ट्रातील ‘शिवधर्म फाऊंडेशन’ या संस्थेने महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी आणि त्यातही छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा होणारा अवमान रोखण्यासाठी राज्यात कार्यरत ‘संभाजी ब्रिगेड’ नावाच्या संघटनेचे नाव पालटण्याची मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे नाव पालटण्यासाठी ‘शिवधर्म फाउंडेशन’चे संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्चपासून आंदोलन !

संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव ‘संभाजी’ या एकेरी शब्दाने प्रसिद्ध होत असल्याने महाराजांचा अवमान !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात ! ; कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !

पुणे येथे तरुणाने स्वतःच्या पाळीव कुत्र्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी त्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. तरुणाने कुत्र्याला फासावर लटकावून त्याला जिवे मारले.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्याकडून जाहीर क्षमायाचना !

संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय मेळाव्यात महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याविषयी अश्लाघ्य वक्तव्ये केली होती.

सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी !

संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या वेळी हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या.

संभाजी ब्रिगेडवर कायमस्वरूपी बंदी घाला ! – स्वामी भक्तांची मागणी

हिंदूंच्या देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक अवमानकारण वक्तव्य केले आहे.