|

रत्नागिरी – येथील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मध्ये राष्ट्रगीत ऐच्छिक असल्याचा आणि मुसलमान विद्यार्थ्यांना प्रत्येक शुक्रवारी प्रार्थनेसाठी विशेष जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप येथील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणी कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना जाब विचारत जोरदार निषेध केला. यानंतर प्राचार्यांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
१. रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रगीत नियमितपणे म्हणणे अपेक्षित असतांना ते अनेकदा दैनंदिन कामकाजातून वगळले जात आहे.
२. मुसलमान विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी विशेष जागा उपलब्ध करून दिली जात आहे.
३. हे प्रकार सातत्याने घडत असल्याने १७ एप्रिलला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते महाविद्यालयात गेले आणि त्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन त्यांना काही व्हिडिओ दाखवले.
४. महाविद्यालयात गणवेश सक्तीचा नियम केवळ हिंदु विद्यार्थ्यांना काटेकोरपणे लागू केला जातो, तर मुसलमान विद्यार्थ्यांना कोणतेही बंधन नसल्याचे दिसून येते.
५. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रगीत हा प्रत्येक भारतियाचा अभिमान आहे. ते ‘ऑप्शन’ला टाकणे आणि ठराविक समाजाला विशेष सवलत देणे, हे अत्यंत निंदनीय आहे. हिंदु विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
प्राचार्यांची दिलगिरी आणि आश्वासन !या सर्व सूत्रांवर कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना जाब विचारल्यानंतर प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त केली. प्राचार्यांनी आश्वासन दिले की, असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जाईल आणि अनुचित प्रकार त्वरित थांबवले जातील. |
संपादकीय भूमिकायावरून शासकीय शिक्षण संस्थांचे इस्लामीकरण चालू असल्याचे लक्षात येते ! राष्ट्रगीत ऐच्छिक करण्याचा, तसेच मुसलमान विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी विशेष जागा देण्याचा निर्णय घेणार्यांची नावेही जनतेसमोर आली पाहिजेत आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ! |