अफगाणींची खदखद

भारताच्या शेजारी पाक आणि चीन यांसारखे मोठे शत्रू आहेत. अशा वेळी भारताला अफगाणिस्तानमध्ये हातपाय पसरण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अफगाण सरकारला पाकही त्यांचा शत्रू वाटतो. सरकारने प्रबळ इच्छाशक्ती दाखवून पाकपुरस्कृत आतंकवाद संपवून अफगाणिस्तानात झेप घ्यावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

‘कोरोना’रूपी भ्रष्टाचार !

लाचखोरी आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी प्रामाणिक लोकांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजमनावर धर्मशिक्षणाचे संस्कार होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी संघटित होऊन याविरोधात लढा दिला, तर यश मिळू शकते, तसेच अशा लढ्याला ईश्‍वरी अधिष्ठान असेल, तर यश निश्‍चित !

प्रदूषणाचे कारक

आता जो दृश्य संकटकाळ दिसत आहे, तो वास्तविक संकटकाळ नसून ती निसर्गानेच आरंभलेली शुद्धीकरण प्रक्रिया आहे. निसर्ग त्याचे प्रदूषण स्वतःच दूर करील; त्याचे तडाखे मात्र मानवाला सोसावे लागतील. त्याशिवाय मानवाला स्वतःच्या आचार-विचारांत पालट करावाच लागेल. वृत्ती सुधारली की, सर्व स्तरांवर परिवर्तन घडते !

कुचराई नकोच… !

लस साठवण्यासाठी जागा आणि लसीच्या वितरणाची योग्य ती कार्यपद्धत राज्यांनी बारकाईने बसवणे, हे राज्यांचे दायित्व रहाणार आहे; त्यात चुका, गोंधळ, भ्रष्टाचार आदी गोष्टी झाल्या, तर आपल्यासारखे वाईट आपणच असणार आहोत. लस मिळूनही ती जनतेपर्यंत व्यवस्थित पोचली नाही, तर ‘देव देतो आणि कर्म नेते’ असे होईल !

‘ब्राह्मोस’ चाचणीच्या निमित्ताने…! 

भारतीय सैनिकांना मरणोत्तर सन्मान नको, तर विजयी होऊन त्यांनी जिवंतपणी सन्मान स्वीकारावेत, असे त्यांच्या घरच्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वाटते. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवनवीन शस्त्रास्त्रसज्जतेची वृत्ते येतात, तेव्हा ‘शक्तीमान असूनही किती दिवस दुबळ्याप्रमाणे जीवन कंठत रहायचे ?’, असा प्रश्‍न राष्ट्राभिमान्यांना वारंवार पडतो.

वीजदेयकांचा गोंधळ !

महावितरण शासकीय असल्याने ते खासगी आस्थापनाप्रमाणे ग्राहकांना लुबाडण्याची शक्यता अल्प आहे; परंतु येथे मानवी चुकांचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहकांना मनस्ताप भोगावा लागत आहे. अशा चुका करणार्‍या कर्मचार्‍यांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई झाली, तरच त्या चुका अल्प होऊ शकतात.

अन्सारींचे नक्राश्रू !

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्‍न आहे !

हिंदु मुलींचे दलाल !

मोदी सरकारने या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता हिंदु मुलींची अब्रू वाचवणारा, त्यांची दलाली रोखणारा आणि प्राण वाचवणारा कायदा येण्यासाठी राज्यघटनेत आवश्यक ते पालट करावेत, अशी तमाम हिंदूंची अपेक्षा आहे !

लसीची प्रतिक्षा…!

‘भारतीय संस्कृतीने दिलेला औषधांचा, आहार-विहाराचा आणि धर्माचरणाचा अनमोल ठेवा कोरोनासारख्या संकटात संयमी भारतियांच्या कामी आला’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. येणार्‍या काळात ‘कोरोनापेक्षा कितीही भयंकर विषाणू आले, तरी भक्तीचे शस्त्र त्याला सर्व औषधे उपलब्ध करून देईल’, ही श्रद्धाच भारतियांना यापुढेही तारून नेईल !

राष्ट्रघातकी काँग्रेस !

भारत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लक्ष्यभेद करण्याचे धाडस दाखवत नाही, हेच सत्य आहे. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, आताच्या लोकांना केवळ मासाच दिसतो आणि त्यांचे बाण अन्यत्रच लागत आहेत. त्यामुळे जे साध्य करायचे आहे, ते होत नाही. ही स्थिती पालटली पाहिजे.